शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचे नियम शिथिल करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST

श्रीरामपूर : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोरोना लॉकडाऊन नियम शिथिल करताना व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही, या दृष्टीने लॉकडाऊन नियम ...

श्रीरामपूर : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोरोना लॉकडाऊन नियम शिथिल करताना व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही, या दृष्टीने लॉकडाऊन नियम शिथिल करावेत, अशी व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे.

शासनाने नुकतेच लॉकडाऊन शिथिल करून २८ जूनपासून सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. दुकान उघडण्याची वेळ बाजारपेठेच्या व व्यापाऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीची आहे. सकाळी ७ वा. व्यापाऱ्यांना दुकाने उघडणे शक्य नाही. ९ नंतर ग्राहक खरेदीसाठी घरातून बाहेर पडतात. तर ग्रामीण भागातील छोटेमोठे दुकानदार हे दुकाने सुरू करून घरातील व शेतीतील कामाची लाइन लावून दुपारी जेवण केल्यानंतर नजीकच्या मोठ्या बाजारपेठेत तालुक्याच्या ठिकाणी माल खरेदीसाठी येतात.

सकाळी ७ वा. दुकाने उघडण्यासाठी वेळ व दुपारी ४ वा. दुकाने बंद करण्याचा आदेश यामुळे धंद्यावर मोठा परिणाम होत आहे. अगोदरच ३ ते ४ महिन्यांच्या कोरोना लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक व औषधांची दुकाने सोडून सर्व व्यवहार बंद होते. यामुळे व्यापारी वर्ग अधिकच संकटात सापडला आहे. लॉकडाऊन शिथिल झाला, परंतु सकाळी ७ ते ४ ही वेळ गैरसोयीची आहे. तसेच शनिवार व रविवार लॉकडाऊन सक्तीचे असू नये.

...........

यांनी केली मागणी

कापड व्यापारी हरचरणसिंग चुग, स्टेशनरी व्यापारी, रमेश गुंदेचा, क्रॉकरी दुकानदार, बबलू आहुजा, सौंदर्य प्रसाधने व प्रेझेंट वस्तू विक्री करणारे राजेंद्र पवार, भांडी दुकानदार सुधीर डंबीर, नंदू अंभोरे, विजय डंबीर, सराफ व्यापारी सचिन महाले, पोपट चापानेरकर, दिलीप नागरे, हॉटेल व्यावसायिक जयंत क्षीरसागर, रमेश वैद्य, रेस्टॉरंट चालक सुनील गुप्ता यांनी नियम शिथिल करण्याची मागणी केली.

..........

उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी

शासनाने यापुढे लॉकडाऊन शिथिल करताना दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ९ ते १०च्या दरम्यान व सायंकाळी ६ ते ७ ही दुकाने बंद करण्याची वेळ ठेवावी. कमी वेळ दुकाने उघडी असल्यामुळे बाजारपेठेत गर्दी दिसते, दुकाने बंद करण्याची, उघडण्याची वेळ बदलली तर बाजारात व दुकानामध्ये गर्दी दिसणार नाही. कोरोनावर मात करता येईल. कोरोनाच्या नियमांचे पालन झाले पाहिजे. उल्लंघन करणाऱ्यांवर अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली पाहिजे. नागरिक, ग्राहकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण होऊन काटेकोरपणे पालन होऊ शकते.