पिंपळगावखांड लघुपाटबंधारे प्रकल्प पाणलोटातील पिंपळगावखांड-कोतुळ नवीन उंच पुलाचे भूमिपूजन सोमवारी आमदार लहामटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
लहामटे म्हणाले, कोतुळ पुलाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण होईल. शेतीला पाण्याची अडचण येऊ देणार नाही. शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार लहामटे यांनी यावेळी केले. सुमारे २० कोटी रुपये खर्चाचा हा उंच पूल साकारत आहे. पुलाचे काम होणे हे मुळा विभागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पुलाचे काम करताना लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही ही भूमिका प्रशासनाची राहील. माझ्या आगोदर ज्यांनी पाण्याचे राजकारण केले तसे माझ्याकडून होणार नाही. खालचे आणि वरचे असा भेदभाव मी करणार नाही. विरोधक पाण्याचा वाद निर्माण करून जनतेत विष कालवून संभ्रम निर्माण करीत असून आता ही बाब खपवून घेतली जाणार नाही.
बी. जे. देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, सुरेश गडाख, सचिन नरवडे, सदाशिव साबळे, अभिजीत देशमुख, सचिन गीते, संपत नाईकवाडी, सुरेश खांडगे, कैलास शेळके, स्वाती शेणकर, उज्ज्वला राऊत, रामनाथ शिंदे, नवनाथ गायकवाड , नामदेव भांगरे, नारायण डोंगरे, सरपंच भानुदास लोहकरे, उपसरपंच संजय देशमुख, संगीता भुजबळ, संदीप देशमुख, नानासाहेब खर्डे, मुकुंद देशमुख, ईश्वर वाकचौरे, अशोक माळी, अरुण रुपवते, सयाजी देशमुख, चंद्रकांत घाटकर, शाम देशमुख, फारूक पठाण उपस्थित होते.