शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पाणी दुर्भिक्ष्यावर संशोधन करणारा परदेशी अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 16:13 IST

गेल्या १७ वर्षांपासून स्वित्झर्लंड येथील एक अवलिया ठिकठिकाणी भेटी देऊन संशोधन करीत आहे. याबाबत त्याने वेगवेगळे प्रयोगही केलेले आहेत.

संडे विशेष / बाळासाहेब काकडे  । श्रीगोंदा : महाराष्ट्रातील पाण्याचे दुर्भिक्ष्य कसे कमी करता येईल यावर गेल्या १७ वर्षांपासून स्वित्झर्लंड येथील एक अवलिया ठिकठिकाणी भेटी देऊन संशोधन करीत आहे. याबाबत त्याने वेगवेगळे प्रयोगही केलेले आहेत. कमीत कमी पाण्यावर जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखली कसे आणता येईल याबाबतही ते जनजागृती करीत आहेत.डॉ. आॅक्सर फ्लुक असे त्या परदेशी अवलियाचे नाव आहे. डॉ. फ्लुक हे गेल्या १७ वर्षापासून मुंबई विद्यापीठात जर्मन भाषेचे व्याख्यान देण्यासाठी येतात. त्यांनी भारतातील विविध भागात जाऊन पाण्याच्या दुर्भिक्ष्याबाबत निरीक्षण  केले आहे. त्यांना महाराष्ट्रातील शेती व शेतकºयांची गोडी लागली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, नगर येथील स्नेहालय व श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे या संस्थेशी त्यांची नाळ जोडली गेली आहे.डॉ. फ्लुक यांनी अलिबाग, मुरूड, राळेगण सिद्धी व चिखली (ता. श्रीगोंदा) येथे बाष्पीभवन कमी व्हावे यासाठी काय करता येईल. शेतीला कोणत्या वेळी पाणी दिले तर पाण्याची बचत करता येईल यावर प्रयोग केले. संध्याकाळी व सकाळी लवकर पिकाला पाणी दिले तर पाण्याची बचत होते. पिकाला दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊ शकते, असे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. पाणी बचतीबाबात ते गावोगावी जाऊन जनजागृती करत आहेत.लोणीव्यंकनाथला युवकांना मार्गदर्शनफ्लुक यांनी लोणी व्यंकनाथ, चिंभळे येथे तरुणांनी हाती घेतलेल्या वृक्ष लागवड प्रकल्पास भेट दिली. पाण्याचे वाढते बाष्पीभवन व पाण्याची बचत याबात त्यांनी युवकांना धडे दिले. शेतीत करिअर करायचे असेल तर पाण्याचे नियोजन करावेच लागेल, असा कानमंत्र त्यांनी दिला. यावेळी बंडू जगताप, गणेश खंडागळे, बापू कोकरे, गणेश जगताप, आशिष काकडे, नामदेव जठार, महेंद्र साळवे, बाळू जगताप, शफिक शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाforestजंगलenvironmentपर्यावरण