शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये महाविकास आघाडीत फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST

अहमदनगर : राज्यात एकत्र असलेल्या महाविकास आघाडीत नगरमध्ये फूट पडली आहे. महापौर निवडणुकीत सेना-राष्ट्रवादीने काँग्रेसला सुरुवातीपासूनच विश्वासात घेतले नाही. ...

अहमदनगर : राज्यात एकत्र असलेल्या महाविकास आघाडीत नगरमध्ये फूट पडली आहे. महापौर निवडणुकीत सेना-राष्ट्रवादीने काँग्रेसला सुरुवातीपासूनच विश्वासात घेतले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसने महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांसाठी अर्ज घेत बिनविरोधचा मार्ग राेखून धरला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या घोषणेनंतरचही नगरच्या महापौरपदाची ही पहिलीच निवडणूक आहे. महापौरपदासाठी बुधवारी ऑनलाइन मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारी प्रारंभ झाला. सेना व राष्ट्रवादीने एकत्र येत सेनेच्या नगरसेविका रोहिणी शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, सेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विनीत पाऊलबुद्धे आदी सेना व राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. महापालिकेत काँग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. महापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. काँग्रेसने महापौर या पदावर दावा ठोकला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन शहरातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली होती. त्यानंतर मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सेना- राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार सेना- राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक जाणीवपूर्वक गैरहजर राहिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी पत्नी शीला चव्हाण यांच्या नावाने अर्ज नेले आहेत.

.................................

वरिष्ठ नेत्यांचा संपर्क नाही

राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेसचा समावेश आहे. नगर महापालिकेत काँग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. काँग्रेसचे मनपातील संख्याबळ कमी असले तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून काँग्रेसला विश्वासात घेणे अपेक्षित होते. परंतु, काँग्रेसला विश्वासात घेतले गेले नाही. याबाबत वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क केला नाही. हे विशेष.