शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मिरजगावमधील मत्स्यबीज केंद्र २० वर्षांपासून कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 11:27 IST

राज्य सरकारच्या मत्स्य विभागाकडून कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डे येथे सीना धरणाच्या पायथ्याशी लाखो रूपये खर्च करून उभारलेले अद्ययावत सीना मत्स्यबीज संवर्धन केंद्र गेल्या २० वर्षांपासून कागदावरच आहे.

विनायक चव्हाणमिरजगाव : राज्य सरकारच्या मत्स्य विभागाकडून कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डे येथे सीना धरणाच्या पायथ्याशी लाखो रूपये खर्च करून उभारलेले अद्ययावत सीना मत्स्यबीज संवर्धन केंद्र गेल्या २० वर्षांपासून कागदावरच आहे.सीना धरण हे तालुक्यातील एकमेव धरण आहे. त्याच्या पायथ्याशी आठ एकरावरील या केंद्राच्या माध्यमातून या भागातील शेतकरी, मत्स्य व्यावसायिकांना फायदा होण्याची अपेक्षा असताना अधिकारी हे केंद्र कागदावरच चालवित आहेत. सध्या हा परिसर वेड्या बाभळीत हरवला आहे. या ठिकाणी आठ ते दहा मत्स्यबीज तलाव होते. या जमिनीवर काहीच होत नसल्याने सध्या मूळ शेतजमीन मालकांनी या जमिनी कसण्यास सुरूवात केली आहे. तसेच आमच्या जमिनी परत मिळाव्यात, अशी मागणीही जमीन मालकांनी केली आहे.२००३-२००४ चा अपवाद सोडल्यास या केंद्रासाठी पाण्याची कमतरता कधीच नव्हती. भोसे खिंडीतून कुकडीचे पाणी सीना धरणात आल्यापासून धरणात व केंद्राच्या विहिरीत मुबलक पाणी आहे. गेल्या वीस वर्षांपासून हे केंद्र कार्यान्वित करण्याबाबत संबंधितांची उदासीनता आहे. हे केंद्र सुरू झाल्यास मत्स्यबीजास परिसरातून मोठी मागणी होऊ शकते. तालुक्यातील माशांची मोठी बाजारपेठ आहे. मत्स्य व्यवसाय करणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात मत्स्य संगोपनासाठी तलाव भाडे तत्त्वावर घेतात. या तळ्यात मत्स्यबीज सोडण्यासाठी भिगवण, करमाळा, पुणे, संगमनेर, मुळा धरण येथून मत्स्यबीज आणतात.परंतु व्यावसायिकांना हे परवडत नाही. यामध्ये जादा पैसे व वेळ वाया जातो. या व्यवसायातून कर्जत तालुक्यात लाखो रूपयांची उलाढाल होऊन अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. या केंद्रामुळे व्यवसाय वृद्धीसोबतच तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली असती. हे केंद्र सुरू करण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.या केंद्राच्या निर्मितीपासून नेमलेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी जूनमध्ये सेवानिवृत झाला. एक चौकीदार कर्मचारी आजही हे केंद्र सुरू नसल्यामुळे येथे एकटाच काळ्या पाण्याची सजा भोगत आहे. या ठिकाणच्या इमारतीचे फक्त अवशेष बाकी आहे.धरणात कायमस्वरूपी पाणी नसल्याने, मत्स्यबीज संवर्धन तलावात नैसर्गिक पाणी मिळत नाही. विहिरीतून पाणी उचलून टाकल्यास ते पाणी पाझरून जाते. विजेचाही प्रश्न उपस्थित होत होता. केंद्र उभारताना अनेक तांत्रिक त्रुटी राहिल्याने हे केंद्र यशस्वी झाले नाही. -नागनाथ भादुले, सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, अहमदनगर

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयKarjatकर्जत