शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
4
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
5
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव तालुक्यातील शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:16 IST

कोपरगाव : गेली पाच वर्षे मुंबई येथे होणारी गोदावरी लाभ क्षेत्राच्या कालवा सल्लागार समितीची बैठक यंदा कोपरगावात झाली. यात ...

कोपरगाव : गेली पाच वर्षे मुंबई येथे होणारी गोदावरी लाभ क्षेत्राच्या कालवा सल्लागार समितीची बैठक यंदा कोपरगावात झाली. यात एक रबी व दोन उन्हाळ अशा तीन आवर्तनांच्या तारखा जाहीर झाल्या नाही. तसेच बैठकीनंतर दीड महिना उलटूनही आवर्तनांच्या तारखाच जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे कोपरगावात ही बैठक घेऊन नेमका काय फायदा झाला ? असाच प्रश्न कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक ही कोपरगावात ७ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात आली. या बैठकीत तारखा जाहीर न करता तीन आवर्तनांची घोषणाही करण्यात आली. या बैठकीपूर्वी पाटबंधारे विभागाच्या वतीने समितीच्या बैठकीसाठी नियोजित तीन आवर्तनांच्या संभाव्य तारखा गृहीत धरून टिपण्णी तयार करण्यात आली होती. त्यामध्ये रबीचे १५ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२१ असे ३२ दिवस, तसेच उन्हाळचे १ ते मार्च २५ मार्च - २५ दिवस व तिसरे १ ते २५ मे - २५ दिवस असे संभाव्य नियोजन केले होते; परंतु बैठकीत तसेच अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. यासंदर्भात पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांची पाण्याची मागणीच नसल्याने आवर्तनाचे नियोजन करता येत नाही, असे सांगण्यात आले. त्यांचे म्हणणे सत्य असेल तर १० डिसेंबर २०२० अखेर डाव्या कालव्यावर ७ नंबर अर्जावर ९३० हेक्टर व पाणी वापर संस्थांचे ८५० हेक्टर असे मिळून १ हजार ७८० हेक्टर व उजव्या कालव्यावर फक्त मागणी अर्जावर १ हजार ८०० हेक्टर दोन्ही मिळून ३ हजार ५८० हेक्टर इतक्या हेक्टरसाठी पाण्याची मागणी झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या म्हणण्यानुसार ही शेतकऱ्यांची मागणी नाही का ? हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

...................

कोपरगावात झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीला साधारणतः दीड महिना उलटून देखील आवर्तनाच्या तारखांचा प्रोग्राम जाहीर झालेला नाही. धरण पूर्ण भरलेले असताना जानेवारीत रबीचे १ आवर्तन देण्याचा नक्की अर्थ काय ? त्यामुळे येथून पुढे उन्हाळ आवर्तनाप्रमाणे रब्बीचे आर्वतनाचा देखील कालावधी पुढे ढकलण्याचा डाव दिसतो आहे. असे एक सामान्य शेतकरी म्हणून माझे मत आहे.

- तुषार विध्वंस, शेतकरी, कोपरगाव