शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी नदीकाठच्या परिसराला अतिवृष्टी झाल्यास पुराचा असतो धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:22 IST

कोपरगाव : शहरासह तालुक्याला गोदावरी नदी वर्षानुवर्षे वरदान ठरत आहे. या नदीमुळे कोपरगाव शहर व तालुक्यातील नदीकाठच्या गावांना ...

कोपरगाव : शहरासह तालुक्याला गोदावरी नदी वर्षानुवर्षे वरदान ठरत आहे. या नदीमुळे कोपरगाव शहर व तालुक्यातील नदीकाठच्या गावांना समृद्ध केले आहे. पावसाळ्यात नदी वाहती राहिल्यास परिसरातील शेती समृद्ध होते. मात्र, अतिवृष्टी झाल्यास नदीला आलेल्या पुरामुळे रुद्रावतार धारण केल्याने नदीकाठच्या परिसराची दाणादाण होऊन नागरिकांची चांगलीच धावपळ होते. प्रसंगी धोकादेखील निर्माण होतो.

गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यातून होतो. या नदीला येणारे पाणी हे नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून येते. हे सर्व पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात एकत्र होते, त्यानंतर गोदावरीत पाणी सोडले जाते. पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास कोपरगाव शहरातील नदीकाठच्या उपनगरांना तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना मोठा फटका बसतो. हजारो कुटुंबाना पूरपरिस्थितीत सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागते. मागील दहा- बारा वर्षात अशी परिस्थिती चार ते पाच वेळा उद्भवली होती. दोन वर्षापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्येदेखील गोदावरी नदीला पूर आल्याने चांगलीच दाणादाण झाली होती. त्यावेळी प्रशासनातील सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची तसेच स्वयंसेवी संस्था तसेच सयंस्वेकांची चांगलीच दमछाक झाली होती.

.............

या उपनगरांना बसतो फटका

कोपरगाव शहरातील नदीकाठच्या बाजारतळ, सराफ बाजार, पांडेगल्ली, इंदिरानगर, गोरोबानगर, दत्तनगर, महादेवनगर, सर्व्हे नं. १०५, मोहिनीराजनगर, बेट परिसर, बसस्थानक, मुख्यरस्ता, कालेमळा, सप्तर्षी मळा, बजरंगनगर, जुनी मामलेदार कचेरी, खंदक नाला, गोकुळनगरी या परिसरात पुराचे पाणी शिरते. त्यामुळे येथील सर्व घरे पाण्यात असतात.

.............

या गावांना बसतो फटका

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर, धारणगाव, वडगाव, बक्तरपुर, चासनळी, मोर्वीस, मळेगावथडी, हिंगणी, सांगवी भुसार, कुंभारी, मायगाव देवी, माहेगाव देशमुख, जेउरकुंभारी, जेऊर पाटोदा, डाउच खुर्द, डाउच बुद्रूक, संवत्सर, मनाई वस्ती, कोकमठाण, सडे, वारी, शिंगवे, पुणतांबा, रस्तापूर, बोरबने वस्ती, बनकर वस्ती, कातनाला परिसरातील हजारो घरात गोदावरी नदीचे पाणी शिरते. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागते.

.............

गोदावरी नदीला पूर आल्यानंतर आमच्या संपूर्ण परिसरात पाणी असते. घरेदेखील पाण्यात असतात त्यामुळे खूप नुकसान होते. पूर असताना इतरत्र स्थलांतरित व्हावे लागते. पूर ओसरल्यानंतर घरात मातीमिश्रित गाळ, काटेरी झुडपे वाहून आलेली असतात. त्यामुळे दरवर्षीच्या पावसाळ्यात चार महिने आम्ही भीतीच्या सावटाखाली असतो.

- मंगेश मोरे, रहिवासी, महादेव नगर

..................

आम्ही गोदावरी नदीकाठी वसलेल्या जवाहर नगरमध्ये राहतो. हा परिसर नदीपात्राच्या १ हजार फूट अंतरावर आहे. पावसाळ्यात नदीला १ लाख क्यूसेकपर्यंत जरी पाणी सोडण्यात आले. तर आमच्या परिसरातील नागरिक तणावात असतात. नदीला पूर आलाच तर आमची घरे छतापर्यंत पाण्यात बुडालेली असतात. अशा वेळी आमचे गावातील जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्यात येते.

- गणेश सोळसे, रहिवासी वारी ता. कोपरगाव

................

फोटोओळी -

गोदावरी नदीला पूर आल्यानंतर नदीकाठचा हा संपूर्ण परिसर पाण्यात असतो.

..............

फोटो२८- गोदावरी पूर क्षेत्र - कोपरगाव