शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

खराब हवामानामुळे शिर्डीतील पाच उड्डाणे रद्द, प्रवाशांचा मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 22:38 IST

प्रवाशांची गैरसोय : विमान कंपनीकडून प्रवाशांची राहण्याची व्यवस्था

शिर्डी : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पावसामुळे निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे भोपाळ, दिल्ली, बंगलोर आणि मुंबई आदी विमानांचे लँडींग न होताच ती परत गेली. संध्याकाळी दिल्ली येथून आलेल्या विमानाचे शिर्डीत लँडींग झाले, परंतु टेकऑफसाठी हवामान चांगले नसल्याने या विमानाचेही उड्डाण रद्द करण्यात आले.

१८० प्रवासी घेऊन परत दिल्लीच्या दिशेने टेकऑफ करण्याच्या तयारीत असताना उड्डाणासाठी व्हीजीबीलीटी मिळत नसल्याने दिल्लीला जाणाऱ्या या विमानाचेही टेकऑफ रद्द झाले असून या विमानातील प्रवाशांची विमान कंपन्यांनी शिर्डीत राहण्याची व्यवस्था केली आहे. मंगळवारी टेकऑफसाठी व्हीजीबीलीटी मिळताच दिल्लीचे विमान उडेल. दिल्ली, भोपाळ, बंगलोर आणि मुंबई येथे जाण्यासाठी चारशेच्यावर प्रवाशांनी आपली तिकिटे बुक केलेली होती. मात्र खराब हवामानाचा फटका बसल्याने ही विमाने शिर्डीत न उतरता परत गेली. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. 

साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टवर विमानांचे लँडींग व टेकऑफसाठी पाच किलोमीटर अंतराची व्हीजीबीलीटी आवश्यक असते. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ व पावसाच्या वातावरणामुळे तीन किलोमीटरच्या आतच व्हीजीबीलीटी मिळत असल्याने विमानांचे लँडींग व टेकऑफ रद्द करावे लागले. मंगळवारी व्हीजीबीलिटी मिळाली तर नियमित लँडींग व टेकऑफ करण्यात येईल. - दीपक शास्त्री, डायरेक्टर, शिर्डी एअरपोर्ट

टॅग्स :shirdiशिर्डीShirdi Airportशिर्डी विमानतळairplaneविमानAirportविमानतळRainपाऊस