शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची स्थिती चिंताजनक

By admin | Updated: November 20, 2014 14:17 IST

जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील खरीप वाया गेले, तर दुसरीकडे ७५0 गावांवर पाणी संकट कोसळणार आहे.

जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील खरीप वाया गेले, तर दुसरीकडे ७५0 गावांवर पाणी संकट कोसळणार आहे. काही तालुक्यातील फळ पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले असून,शेतकर्‍यांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.

जिल्ह्यात कमी पाऊस पडला. कमी पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला. केलेला खर्चही निघाला नाही. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत १ हजार ५९९ गावे आहेत. खरिपाची पिके घेणार्‍या गावांची संख्या ५८१ तर रब्बीची १ हजार १८ गावे आहेत. रब्बीची पिके सध्या उभी आहेत. नुकत्याच झालेल्या आवकाळी पावसाने रब्बीच्या पिकांना काहिसा दिलासा मिळाला. परंतु पाण्याअभावी खरिपाची पिके वाया गेली. खरिपाच्या सुधारित आणेवारीनुसार पन्नासपैसेपेक्षा कमी आणेवारी असणार्‍या गावांची संख्या ३0५ झाली आहे. या गावातील शेतकरी पिके वाया गेल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे. पीक गेले आणि पिण्याच्या पाण्यासाठीही त्यांच्यावर वणवण करण्याची वेळ येणार आहे. त्यांना आता एकमेव रब्बी पिकांची आशा आहे. या पिकांना जीवदान देण्यासाठी शक्य तिथे जलाशयातून आवर्तन सोडण्यात आले होते. परंतु अवकाळी पाऊस झाल्याने आवर्तन बंद करण्यात आले आहे. प्रशासनाने हात आखडता घेतल्याने रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. अवकाळी पावसाने हजेरी लावली. पण पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट कायम आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टंचाई कृती आराखडा तयार केला जात आहे. जिल्ह्यातील १ हजार ५९९ गावांपैकी डिसेंबरपर्यंत २0२ गावांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. तर ८७0 वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागेल. पहिल्या टप्प्यात टँकरसाठीचा खर्च ५ कोटी १३ लाखांच्या घरात जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येत्या जूनपर्यंत सुमारे ६५0 गावे आणि २ हजार ३0२ वाड्या टँकरवर अवलंबून असणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनवारांच्या चार्‍याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यात काही दीर्घकालीन योजनादेखील प्रशासनाकडून राबविल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)
 
पारनेर३१ पंचनामाच्या सूचना
■ नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून कृषी विभागासह तहसीलदार आणि तलाठय़ांना करण्यात आल्या आहेत. डिसेंबरपर्यंत
■ गावे- २0२, वाड्या- ८७0
जानेवारी ते मार्च
■ गावे-४९७, वाड्या- १,७३0 
एप्रिल ते जून
■ गावे- ७५0, वाड्या- २,३0२ अहमदनगर: जिल्ह्यातील १५ हजार ५९९ गावांपैकी खरीप पिकाची पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणारी तब्बल ३0५ गावे आहेत.