शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
4
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
5
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
6
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
7
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
8
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
9
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
10
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
11
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
12
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
13
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
14
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
15
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
16
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
17
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
18
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
19
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
20
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 

जिल्हा रुग्णालयात आता नैसर्गिक ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:21 IST

अहमदनगर : जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यासाठी दररोज चार टँकर ऑक्सिजनची गरज असताना सध्या फक्त दोन ते ...

अहमदनगर : जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यासाठी दररोज चार टँकर ऑक्सिजनची गरज असताना सध्या फक्त दोन ते तीन टँकर येत आहेत. ऑक्सिजन पूर्ण क्षमतेने मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हवेतील ऑक्सिजन रूग्णांना देण्यासाठीची यंत्रणा जिल्हा रूग्णालयात बसविण्यात आली आहे. पुढील तीन दिवसात हा प्रयोग सुरू होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांना दिली.

आमदार पवार यांनी शनिवारी नगर शहरातील आठ ते दहा खासगी रुग्णालये, जिल्हा रुग्णालयात जावून कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, रूग्णांना ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता आहे. जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी पालकमंत्री, प्रशासन लक्ष ठेवून आहेत. जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, खासगी रूग्णालयांना सध्या ५० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. याचे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रशासन, शासन लक्ष ठेवून आहे. जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ण क्षमतेने व्हावा, यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची बैठक झाली. जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात सातत्याने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या ऑक्सिजनची कमतरता भासत असून, तो पुरवठा कसा सुरळीत होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कोरोनाचे स्वरुप बदलले आहे. कोरोनाचा चार दिवसातच फुफ्फुसात शिरकाव होतो. न्युमोनिया होतो. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे जाणवताच चाचणी करून घ्यावी. डॉक्टरांपेक्षा रुग्णाच्या नातेवाईकांचाच रेमडेसिविर इंजेक्शन वापण्याबाबत डॉक्टरांवर दबाव असतो. त्यामुळे गरज असेल तरच त्याचा वापर झाला पाहिजे. रेमडेसिविरपेक्षाही सध्या ऑक्सिजनची मोठी गरज आहे. रेमडेसिविरची निर्मिती होईल, मात्र ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारण्यासाठी वेळ लागणार आहे. रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देणे ही सध्या तारेवरची कसरत आहे. त्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. सध्या उपलब्ध उपचार क्षमता आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या यात मोठी तफावत आहे. यात यंत्रणा कमी पडत असली, तरी सर्वजण काम करत आहेत. राजकारण सोडून माणुसकी म्हणून सर्वांनी काम करणे गरजेचे आहे.

--

मस्ती करणाऱ्यांवर कारवाई करा

निर्बंध लावले असताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे. जीव वाचवणे महत्त्वाचे आहे. अशाही परिस्थितीत लोक बेजबाबदारपणे बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. परंतु, जे गरीब लोक पोट भरण्यासाठी बाहेर पडतात, त्यांच्यावरील कारवाईबाबत प्रशासनाने संवेदनशील असावे, असे पवार म्हणाले.

--------