शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST

जिल्‍ह्यात आतापर्यंत २ लाख ६२ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली असून ३ हजार २१८ जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांशी ...

जिल्‍ह्यात आतापर्यंत २ लाख ६२ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली असून ३ हजार २१८ जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांशी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचाच मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. कुटुंबातील मालमत्ताधारक व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यानंतर संपत्तीच्या वाटणीवरून वारसांमध्ये बहुतांशी वेळेस वाद उद्भवतात. काही वेळेस वडिलांच्या नावावर किती संपत्ती होती याचीही माहिती त्यांच्या वारसांना नसते. मृत्यूनंतर पुढे निर्माण होणाऱ्या या समस्या टाळण्यासाठी बहुतांशी जणांनी हयात असतानाच नोटरी अथवा दुय्यम निबंधक कार्यालयात मृत्युपत्राची नोंदणी केली आहेत तर अनेक जण मृत्युपत्र व हक्कसोडबाबत चौकशी करत असल्याचे नोटरी पब्लिक यांनी सांगितले.

...............

वारसांच्या काळजीपोटी मृत्युपत्र

संपत्तीला अनेक वारसदार असतात तेव्हा कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला तर मालमत्ता हस्तांतरासह इतर अनेक प्रश्न निर्माण होतात. आपल्या पश्चात संपत्तीच्या वाटण्या कशा व्हाव्यात, त्याचे आधीच योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी अनेक जण मृत्युपत्राचा आधार घेत आहेत. यामध्ये वकिलांमार्फत केल्या जाणाऱ्या रजिस्टर मृत्युपत्रासह स्वत: पेपरवर मृत्युपत्र लिहीत आहेत.

........

ग्रामीण भागात प्रमाण कमी

मृत्युपत्र तयार करणाऱ्यांचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरात जास्त आहे. शहरातही नोकरदार, व्यावसायिक या क्षेत्रातील लोक सर्वाधिक जास्त मृत्युपत्र तयार करून घेत आहेत.

..........

गेल्या काही दिवसांत मृत्युपत्र तयार करून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. बहुतांशी जण मृत्यू पत्राबाबत कायदेशीर प्रक्रियेची माहितीही घेत आहेत. नैसर्गिक वारसांव्यतिरिक्त अणखी कोणाला संपत्ती द्यायची असल्यास मृत्युपत्राचे महत्त्व अधिक असते. मृत्युपत्र साध्या कागदावर केले जाऊ शकते. मात्र, कुणी शंका घेऊ नये म्हणून कायदेशीर प्रक्रियाप्रमाणे नोटरी अथवा दुय्यम निबंधक कार्यालयात मृत्युपत्राची नोंद केली जाते.

- ॲड. श्यामराव केकान, नोटरी

..........

कुटुंबप्रमुखाचे अकाली निधन झाल्यानंतर बहुतांशी वेळा संपत्तीबाबत त्याचे कुटुंबीयही अनभिज्ञ असतात. अशा वेळी संपत्तीवर दावे-प्रतिदावे होतात. त्यामुळे मृत्युपत्र करून घेणे गरजेचे आहे. मृत्युपत्र करणाऱ्यांचे ग्रामीण भागात प्रमाण खूप कमी आहे. याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.

- ॲड. शेखर दरंदले, नोटरी

-

डमी आहे