शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बपेक्षाही विषमता स्फोटक

By admin | Updated: June 1, 2014 00:22 IST

अत्याचारविरोधी परिषद : बाबा आढाव यांचे प्रतिपादन

अहमदनगर : राजकीय नेत्यांना लोकांची फक्त मत हवी आहेत. निवडणुकांचा प्रचार ज्या हायटेक पद्धतीने होतो, त्याचपद्धतीने अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी राजकीय मंडळी पुढाकार घेत नाहीत. देशात दहा कोटी म्हातारे आहेत, त्यांची काळजी कोण घेणार? विषमता वाढत राहिली तर जगायचे कसे? विषमता ही बॉम्बपेक्षाही स्फोटक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड बाबा आढाव यांनी केले. सामाजिक न्याय परिषदेतर्फे शनिवारी सहकार सभागृहात झालेल्या राज्यस्तरीय अत्याचार विरोधी परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड आढाव बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत विद्याताई बाळ, अ‍ॅड. असिम सरोदे, सामाजिक न्याय परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, वाल्मिक निकाळजे, अशोक गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. आढाव म्हणाले, जाती अंताची लढाई सुरू केली का? जात-धर्माबद्दल वैज्ञानिक सत्य नाही म्हणून हे विषय अभ्यासक्रमात कधीच आले नाहीत. राजकारणात जाती अंताचा निर्धार नाही. खर्‍या इतिहासाचे संशोधन नाही. सरकार बदलले असले तरी सनातनी व्यवस्था त्यांच्याकडे जात आहे. पुतळ््यांच्या उंचीची स्पर्धा लागली आहे. भावनिकेतवर जोर दिला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सांगायचा अजेंडा वेगळा आणि छुपा वेगळा आहे. केंद्रात बहुमताने सरकार आले असले तरी यामुळे धर्मनिरपेक्षता, समाजवाद नव्हे तर राज्यघटनाच धोक्यात आली आहेत. त्यांच्या वाट्याला सरकार आणि आमच्या वाट्याला फक्त खैरलांजी-खर्डा हेच आहेत का? असा सवाल आढाव यांनी केला. अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत म्हणून सरकारने अद्याप तरी काहीच केले नाही, असे सांगून आढाव यांनी मोदी सरकारवरही ताशेरे ओढले. विद्याताई बाळ म्हणाल्या, अत्याचाराच्या घटना जरी दुर्दैवी असल्या तरी महाराष्ट्रात नवी पहाट आली आहे. न्याय मिळवायचा असेल तर त्याची भिस्त तरुणांवर आहे. शरद पवार यांच्या जिल्ह्यातच सर्वाधिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांची सामाजिक संवेदना बोथट झाली आहे. सत्तेमध्ये मराठ्यांची मिजास आहे. केंद्रात हिंदुत्त्ववादी बहुमत आहे, त्यामुळे येथून पुढे मोठी आव्हाने पेलावी लागणार आहेत. जाती अंताच्या लढ्यात सर्वांनाच सक्रीय व्हावे लागेल. वर्णव्यवस्था तर्कसंगत नाही. पुरुष आणि स्त्री यांनी हातात हात घालून घर व समाज चांगला राहील, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुलगी शिकते, मुले बेकार राहतात. यामधूनच अत्याचारासारखे प्रसंग घडतात, हे दुर्दैवी आहे. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते भानुदास गजभिव, वाल्मिक निकाळजे, बबनराव वडमारे, मीनाक्षी शिंदे, पंडित कांबळे, सिमांत तायडे यांची भाषणे झाली. अरुण खैरे यांनी परिषदेचे सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)