शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
7
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
8
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
9
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
10
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
11
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
12
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
15
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
16
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
17
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
18
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
19
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
20
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

गांधी पिता-पुत्रावर २४ तासात गुन्हा नोंदविण्याचा खंडपीठाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:04 IST

मारहाण, अपहरण व खंडणीप्रकरणी नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह चौघांविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका मंजूर झाली असून, या प्रकरणी चोवीस तासांत गुन्हा दाखल करून हा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

ठळक मुद्दे भाजपा खासदार दिलीप गांधी यांच्यासह चौघांविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका मंजूर झालीया प्रकरणी चोवीस तासांत गुन्हा दाखल करून हा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.या याचिकेत खासदार गांधी यांच्यासह त्यांचा मुलगा नगरसेवक सुवेंद्र गांधी, पवन गांधी व सचिन गायकवाड यांच्या विरोधात आरोप करण्यात आले होते.

अहमदनगर : मारहाण, अपहरण व खंडणीप्रकरणी नगरचे भाजपा खासदार दिलीप गांधी यांच्यासह चौघांविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका मंजूर झाली असून, या प्रकरणी चोवीस तासांत गुन्हा दाखल करून हा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.नगर शहरातील एमआयडीसी येथील सह्याद्री चौकात असलेल्या सालसार व्हील्स प्रा. लि़ या फोर्ड चारचाकी वाहनाच्या शोरूमचे संचालक भूषण गोवर्धन बिहाणी यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेत खासदार गांधी यांच्यासह त्यांचा मुलगा नगरसेवक सुवेंद्र गांधी, पवन गांधी व सचिन गायकवाड यांच्या विरोधात आरोप करण्यात आले होते.गांधी यांनी डिसेंबर २०१४ ते मार्च २०१५ दरम्यान बिहाणी यांच्या शोरूममधून चारचाकी वाहन खरेदी केले होते. या वाहनाची त्यांनी परिवहन विभागाकडे नोंदणी केली होती. काही दिवसांनंतर मात्र खरेदी केलेली चारचाकी गाडी ही जुनी असल्याचा आरोपी त्यांनी केला. याच प्रकरणातून २९ सप्टेंबर २०१५ रोजी पवन गांधी, सुवेंद्र गांधी, सचिन गायकवाड यांच्यासह आणखी काही जणांनी बिहाणी यांच्या शोरूममध्ये घुसून तेथील विक्री व्यवस्थापक यांना मारहाण करून त्यांचे अपहरण करत पैशांची मागणी केली, अशी बिहाणी यांची तक्रार होती. या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नाही, असा त्यांचा आरोप आहे.बिहाणी यांनी यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. पंतप्रधान कार्यालयातून पोलीस प्रशासनाला या प्रकरणी तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तपास करून याप्रकरणात काही तथ्य नसल्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांना दिला. त्यामुळे बिहाणी यांनी खंडपीठात याचिका दाखल करत हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने या याचिकेवर निकाल देताना पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.याचिकाकर्ता भूषण बिहाणी किंवा त्यांच्या वडिलांनी चोवीस तासांत संबंधित पोलीस ठाण्यात जावे. यापूर्वी २१ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यांनी पोलीस अधीक्षकांना तोंडी, तसेच लेखी दिलेल्या निवेदनानुसार तक्रार दाखल करावी. या निवेदनाच्या अनुषंगाने यापूर्वी गुन्हा दाखल नसेल तर पोलीस अधीक्षकांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५४ नुसार तक्रार नोंदवून घ्यावी. पोलीस महानिरीक्षकांनी हा गुन्हा राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) हस्तांतरित करावा. तपास अधिका-यांनी त्वरित तपास करून सत्य शोधून काढावे व त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत पोलिसांनी नगर येथील जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिका-यांना अवगत करावे, असाही आदेश देण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDilip Gandhiखा. दिलीप गांधीBJPभाजपा