शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरीतील विद्यार्थ्याकडून माणुसकी जागवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिर्डी : साईनगरीतील एका पंधरावर्षीय विद्यार्थ्याने समाजातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी माणुसकी जागवणारी चळवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिर्डी : साईनगरीतील एका पंधरावर्षीय विद्यार्थ्याने समाजातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी माणुसकी जागवणारी चळवळ सुरू केली आहे. ही चळवळ भविष्यात जगभर पसरेल, असा या विद्यार्थ्याला विश्वास आहे. मागील कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये त्याने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

साईश विनोद गोंदकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ‘निड फॉर निडी’ हे स्लोगन घेऊन साईशने लॉकडाऊनमध्ये श्रीगणेशा केलेल्या या कार्याची हकिकतही रंजक आहे. सुखवस्तू जीवन जगणाऱ्या साईशला या काळातील समाजाच्या वेदनांनी घायाळ केले. कपडे तंग होऊ लागल्याने वडिलांनी जेव्हा त्याला नवीन कपडे घेण्याचा आग्रह धरला, तेव्हा नवीन कपडे घेण्यापूर्वी त्याने आपले जुने कपडे, पुस्तके व शालेय साहित्य वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील मुलांना वाटून टाकले.

या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधानाने साईशला जगण्याचा नवीन मार्ग दाखवला. दुसऱ्या दिवशी त्याने घरातील शिल्लक व कालबाह्य न झालेली औषधे घेऊन प्राध्यापक असलेल्या वडिलांसह अस्तगावचे ग्रामीण रूग्णालय गाठले. तेथील डॉ. रवींद्र गोर्डे यांच्याकडे औषधे सुपुर्द करून ती गरीब रुग्णांना विनामूल्य देण्यासाठी विनंती केली.

आगळ्यावेगळ्या समाजसेवेने झपाटलेल्या साईशने यानंतर सायकलवर शिर्डीतील अनेक घरी जाऊन त्यांच्याकडील जुने कपडे व शिल्लक औषधे गोळा करून गरजूंमध्ये वाटली. सुरुवातीला चेष्टेने बघणारे अनेक जण आता आपल्याकडील जुने कपडे व औषधे साईशच्या घरी पोहोचवत आहेत. रेन्बो इंटरनॅशनल या साईशच्या शाळेचे संचालक आकाश नागरे व प्राचार्य शैला झुंजारराव यांनीही कौतुक केले. यावरच ते थांबले नाही तर त्यास शालेय वस्तू, कपडे व औषधे देऊ केले. यामुळे त्याचा उत्साह वाढला. काही दिवसांपूर्वी पालघरजवळील सफाळा, केळवा बीचवर सहलीसाठी गेलेल्या साईशने तेथील जयेश राऊत यांची मुले साईश व विदित यांची भेट घेऊन आपल्या विचारांची बीजे रोवली. शिर्डीतील त्याचे अनेक मित्रही आता या चळवळीत सहभागी झाले आहेत.

.....

प्रत्येक विद्यार्थ्याने आठवठ्यात किमान दोन तास समाजासाठी द्यावेत, दर रविवारी एखाद्या वृद्धाला, अपंगाला, रुग्णाला किंवा शेतकऱ्याला मदत करावी. सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला यातून समाजाच्या वेदना कळतील. वास्तवाचे भान येईल.

-साईश गोंदकर, शिर्डी