शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?

By सुधीर लंके | Updated: September 22, 2024 08:42 IST

जाहिरातीमध्ये बँकेने सामाजिक व समांतर आरक्षण राहणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. 

सुधीर लंके, अहमदनगर: राहुल गांधी यांनी आरक्षणाविरोधात भूमिका घेतली म्हणून देशभर भाजपकडून त्यांच्यावर टीका होत असताना अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत मात्र भाजपने नोकर भरतीतून आरक्षण वगळले आहे. जिल्हा बँकेच्या ७०० पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीमध्ये बँकेने सामाजिक व समांतर आरक्षण राहणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. 

यापूर्वी बँक भरती मध्ये आरक्षण दिले जात होते. २०१७ साली बँकेने ४६४ जागांची भरती केली. त्यावेळेस अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, भटक्या जाती हे सामाजिक तसेच दिव्यांग, क्रीडा, महिला हे समांतर आरक्षण देखील होते. यावेळी भरतीत कुठलेही आरक्षण ठेवण्यात आलेले नाही. जिल्हा बँकेमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजप नेते शिवाजी कर्डिले यांच्या गटाची सत्ता आहे. कर्डिले हे बँकेचे अध्यक्ष आहेत. आरक्षणाबाबत 'लोकमत'ने त्यांना विचारणा केली असता त्यांनी बोलणे टाळले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे हे देखील कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत नाहीत.

बँकेने भरतीत आरक्षण का वगळले ? याबाबत राज्याच्या सहकार विभागाचे धोरण काय आहे ही बाब समजू शकलेली नाही. बँकेच्या संचालक मंडळात पाच जागा या आरक्षित प्रवर्गासाठी आहेत. बँकेवर अनुसूचित जमाती, ओबीसी, भटके विमुक्त या प्रवर्गातून संचालक निवडून गेलेले आहेत. या संचालकांनीही आरक्षणाच्या धोरणाबाबत मौन बाळगले आहे. संचालक होण्यासाठी आरक्षण आहे. मात्र कर्मचारी भरतीत आरक्षण नाही असा विरोधाभास बँकेत निर्माण झाला आहे. राजकीय पक्ष याबाबत काय भूमिका घेतात? ही उत्सुकता आहे. बँकेने भरतीचे काम नामांकित कंपन्याऐवजी वर्क वेल या कंपनीला दिले आहे. तोही मुद्दा वादग्रस्त ठरला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरbankबँक