शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

निर्बुद्धांच्या मार्गांवर असते फक्त काट्यांची शोकांतिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 6:30 AM

दूध तापवलं नाही तर ते जसं नासून जातं, अति तापवलं तर ते जसं जळून जातं आणि हवं तितकंच तापवलं तर त्यावर माया ममतेची जाडजूड साय येते.

- विजयराज बोधनकरदूध तापवलं नाही तर ते जसं नासून जातं, अति तापवलं तर ते जसं जळून जातं आणि हवं तितकंच तापवलं तर त्यावर माया ममतेची जाडजूड साय येते. अगदी माणसाचंही आयुष्यही दुधासारखंच आहे. आयुष्यात काहीच केलं नाहीतर आयुष्य दुधासारखं नासून जातं, अगदी तसंच अति सुखाच्या मागे लागलं तर सुखही नासून जातं. जसे दुधापासून कापलेले लिंबू चार हात दूर ठेवावे लागते, तसे षड्रिपूचे लिंबूही दूर ठेवावे लागते. दुधासाठी लिंबू जसे विष असते, तसे उत्तम जगण्यात अति सुखाचे आगमन झाले की माणसाचं मन अस्थिर होत जातं आणि आपल्या अवतीभोवती आपला द्वेष करणारे स्वार्थ साधू पाहणाीे भकास माणसे गोळा होत राहतात आणि ते लिंबूसारखेच असतात.दुधात लिंबू पिळणारी मंथरा वृत्ती आजही आपल्या आजूबाजूला घुटमळत राहू शकते. अशा बऱ्याच घातकी वृत्तीला जिंकणे हेच महत्त्वाचे असते, बरेचदा ती मंथरा मनातही दडलेली असते. म्हणून तर संतसंगतीची परंपरा आपल्या देशात जन्माला आली. चार शब्द कानावर पडले तरी ते औषधासारखे कामी पडतात. अति दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतर मनाला तिथपर्यंत नेण्याअगोदरच मनातल्या सत्संगाची दारे उघडली तर मनातली, डोक्यातली भुतावळ हळूहळू पळून जाऊ शकते. त्यासाठी कुठल्याही सत्संगाच्या मंडपात जाण्याची गरज नसते. आपल्या मनबुद्धीच्या मंडपात आपणच आपला चिंतनाचा सत्संग करू शकतो, अज्ञान आणि ज्ञान याचा गुंता फक्त आपणच सोडू शकतो.अति सुखाची कुटुंबाला लागण झाली की समजायचे आता सत्संगाची वेळ आली आहे. षड्रिपूंचा विजय होण्याअगोदर आपले सत्यवृत्तीचे शस्त्र तयार ठेवले पाहिजे. मोहात अडकून कैकयीचे, रावणाचे काय झाले हे आपण जाणतो. आयुष्यात अकारण मोहात माणूस गुरफटत जातो आणि शेवटी हाती येत काय? केवळ निराशा, बुद्धाच्या मार्गांवर शांती आहे, निर्बुद्धांच्या मार्गांवर असते फक्त काट्यांची शोकांतिका.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक