शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

अशांतस्य कृत्य:सुखं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 04:55 IST

अहंतेत ममता असते ती विस्तारवादी आहे.

- बा.भो. शास्त्रीअहंतेत ममता असते ती विस्तारवादी आहे. विस्तारात अडथळा आला की, अहंता चिडते, अशांती जन्मते म्हणून स्वामी कुठल्याही समस्येच्या मुळापर्यंत जाण्यासाठी विचार देतात. मंदिरात, सत्संगात शांती मिळते हा एक समज आहे. पण देवळांनीच समस्या निर्माण केल्या त्याचं काय? ते पूर्ण सत्य नाही. तो तात्पुरता विसावा असतो. वेदनाशामक औषधीसारखं ते क्षणिक समाधान असतं. कारण हे सगळे उपचार वरचेवर असतात. मूळ बिमारी तशीच असते. औषधीने लक्षणे दिसत नाहीत एवढेच. शिवचरित्रावर चांगले व्याख्यान देणारा वक्ता महाराजांनी ३५० किल्ले ताब्यात घेतले हे न चुकता सांगतो व त्यांनी ते नीट सांभाळले, असेही सांगतो. पण वक्ताच सतत घराची किल्ली विसरतो, त्याचं काय? राजा किल्ला सांभाळतो, हा किल्ली सांभाळत नाही. राजे संयमी होते, विवेकी होते. त्यांच्या विचाराचा संचार मुळापर्यंत होता. संत तुकोबा म्हणतात,‘‘ओलेमूळ भेदी खडकाचे अंगअभ्यासासी सांग कार्यसिद्धी’’दुभंगणाऱ्या पाषाणाचा विचार तुकोबांनी वरवर केला नाही. मुळापर्यंत गेले. मूळ रोगाला असतं, भोगाला असतं, त्यागाला असतं, अशांतीला असतं. आपण साधी माणसं. कार्यकारण भावाचं चिंतन करीत नाही. हेच आपल्या अशांतीचं मुख्य कारण आहे. सुख हे शांतीच्या वेलीला आलेलं मधुर फळ आहे. आपल्याला सुख हवं की शांती? सुख हवं पण ते शांतीशिवाय कसं मिळणार, वेलीशिवाय फूल, फळ कसं मिळणार? ‘अशांतस्य कृत्य:सुखं’ असं गीता ठासून सांगते. जो स्वस्थ असतो तोच मस्त असतो, अस्वस्थ अस्ताव्यस्त होतो, अहंतेच्या आगीत जग होरपळून जात आहे. धर्म, जात, देश, धन, शक्तीचा, कृतीचा, अहंकार हा सर्वत्र व्यापला आहे. शांतीचे रोप लावणारे लावतात, पण ते टिकत नाही. शांती म्हणजे निश्चिंत रहित अवस्था. ताण व काळजी विक्षेपशून्य जीवन.