शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

...... तर विवाह संस्थेचा पायाच खचेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 22:06 IST

"लैंगिकता हा विषय झाकून ठेवल्याने त्यातील रस वाढला जातोय.

ठळक मुद्दे. प्रेम व शारिरिक सुख या भावनांबाबत समाजात जागृती व ज्ञान देण्याची गरज

डॉ. दत्ता कोहिनकर

आजकाल घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे . त्यातून ऐन उमेदीच्या काळात तरुण मुले - मुली डिप्रेशनमध्ये जात आहेत. आयुष्याची वाताहत होत आहे . काही जणांना हे दुःख पचवता नाही आले तर ते आत्महत्येकडे वळत आहेत . पूर्वीच्या रूढीनुसार कांदापोहे व चहाच्या बैठकीत ठरलेली लग्न आज मोडत आहे . पहिल्याच वर्षात संसाराची राखरांगोळी झालेली बऱ्याच ठिकाणी दिसत आहे . त्यातून घटस्फोट दावा , पोलिस , कोर्टकचेरी , कौन्सलिंग , एकमेकांना दहशत , भांडणे , प्रसंगी मारामाऱ्या , अपत्यांची हेळसांड यासारख्या भयंकर प्रकारांनी विवाहसंस्था पोखरली जात आहे . एकरकमी पैसे दिले किंवा घेतले तरी मनाच्या जखमा , भावभावनांचे खुन थांबवणे अवघड झाले आहे . प्रचंड मानहानीने घरे रस्त्यावर येताना दिसत आहेत . हा प्रकार थांबवण्यासाठी बैठकीत पसंती झाली तरी         

आपल्या मुलामुलींना काही काळ एकमेकांबरोबर घालवू द्या . एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांना काही महिने द्या . त्यांना स्वातंत्र्य द्या . काही महिन्यानंतर दोघेही स्वभावाने प्रेमाने एकमेकांच्या पसंतीवर उतरले तरच विवाहबंधनाचा निर्णय घ्या . लंगडत चालणाऱ्या हत्तीचा माहूत लंगडत चालायचा, हत्ती त्याच अनुकरण करायचा . म्हणून गौतम बुद्धांनी हत्तीचा माहूत बदलण्यास सांगीतले व तद्नंतर हत्ती लंगडायचा थांबला . जसा हत्ती माहूताचे अंधानुकरण करत होता तशाच काही जुन्या चालीरीतीच आपण अंधानुकरण करतोय . मित्रांनो या लंगड्या हत्तीवर उपचार करा . जुन्या चालीरीती जर जीवनात दुःख आणत असतील तर त्या बदला . या बदलाची आज नितांत गरज आहे . संस्कृतीच्या नावावर अंधानुकरण करणाऱ्या लोकांनी आज समाजाची मोठी हानी केलीय . एका मुलीचे पती लग्नानंतर एकाच वर्षात वारले . ती नैराश्यात चालली होती, तिच्या आई वडिलांशी चर्चा करून तिचे दुसरे लग्न करून दयावयास सांगितले . ते म्हणाले आमच्यात मुलीचा पुर्न:विवाह करत नाही . अशा विधवा स्त्रियांना सामाजिक चालीरीतीमुळे एकटे रहावे लागते . भावभावनांचा निचरा न झाल्याने त्या नैराश्यात जातात. जास्त चौकटीत राहणारी माणसे दुःखी जीवन जगतात . मध्यम मार्ग हा आनंदाचा पाया आहे .   लग्नानंतर मुलाच्या आई वडिलांनी सुनेला धाकात ठेव, डोक्यावर बसवू नकोस व मुलीच्या घरच्यांनी जावयाला आपल्या मुठीत ठेव , सासू सासऱ्यांपासून वेगळ रहा असे सल्ले थांबवले तरच कुटंबव्यवस्था टिकेल. आज मुलामुलींना लैंगिक शिक्षण द्यावयास हवे. "मुलामुलींच्या लैंगिकतेचा विचार आपल्या समाजात केला जात नाही. मुलामुलींशी लैंगिकतेबाबत बोलणंही अनेकवेळा टाळलं जातं. त्यापेक्षा  त्यांना विश्वासात घेऊन  योग्य लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे. त्यांना स्वतःच्या लैंगिक जाणिवा, नातेसंबंध, स्वतःच्या भावना योग्य प्रकारे कश्या हाताळाव्यात हे समजेल. आपल्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे, याचं ज्ञान त्यांना स्वतःला येईल, अशा प्रकारे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. याबाबत त्यांच्याशी बोललं पाहिजे." लैंगिकता हा विषय झाकून ठेवल्याने त्यातील रस वाढला जातोय . प्रेम व शारिरिक सुख या भावनांबाबत समाजात जागृती व ज्ञान देण्याची आज गरज भासतीय . मुलांची मने आज नुसती मुलींभोवतीच फिरू लागली तर ही मुले चंद्रावर मंगळावर जाण्याचा विचार करणार कधी ?म्हणूनच प्रेमाला व लैंगिक भावनांना समजुन त्यांना योग्य तो न्याय देणाऱ्या बदलाची आज नितांत गरज आहे .यावर आज दुर्लक्ष झाले तर विवाहसंस्था अजुन ढासळेल . व दुःखी व मनोरुग्ण समाजाची निर्मिती होईल .

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नrelationshipरिलेशनशिपDivorceघटस्फोट