शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

विभूती आणि अनुभूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 00:29 IST

कट्टर धार्मिकनिष्ठ आणि कट्टर विज्ञाननिष्ठ असे दोन विचारप्रवाह आज अस्तित्वात आहेत. जिथे रहस्य तिथे वाद असतातच.

- विजयराज बोधनकरया पृथ्वीतलावर अनंत धर्म, भाषा, संस्कृती, वेशभूषा, परंपरा, रूढी आज अस्तित्वात आहेत. जशी मानसिकता तसे तिथले जगणे असते, जशी जिथली भौतिक साधने, तसे तिथले व्यवहार, प्रथा प्रचलित झालेल्या असतात. कट्टर धार्मिकनिष्ठ आणि कट्टर विज्ञाननिष्ठ असे दोन विचारप्रवाह आज अस्तित्वात आहेत. जिथे रहस्य तिथे वाद असतातच. रहस्यमय प्रश्नाच्या उत्तराला प्रमाण नसले की कल्पकता हीच वास्तवता गृहीत धरली जाते आणि त्याचे पुढे स्तोम माजते. कुणी अनुभूतीचे मार्ग अवलंबतात तर कुणी विभूतीचे म्हणजे चमत्काराचे मार्ग अनुसरतात. या दोन्हीत खूप मोठा फरक आहे. बरेचदा ईश्वरीय सत्य समाज नाकारतो आणि मृगजळ स्वीकारतो.

अध्यात्म म्हणजे धार्मिकता नव्हे आणि धार्मिकता म्हणजे अध्यात्म नव्हे. शिर्डीच्या साईबाबांनी सर्व जगाला ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा अध्यात्माचा मोठा महामंत्र दिला, पण त्याचे अनेकांनी आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढले. तिथे कर्मकांड जास्त आणि मंत्राच्या खऱ्या अर्थाकडे दुर्लक्ष होतेय. आयुष्यभर फाटके पण स्वच्छ कपडे घालणाºया साईबाबांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट चढविला आहे. खरेच हे भक्तीचे प्रतीक आहे की फक्त मूर्तीची सजावट आहे. आपल्या कर्माच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली तर सबुरीने सर्व काही प्राप्त होते हा मंत्र साईबाबांनी दिला. अडचणी आणि संकटे मानवाच्या कृत्यातून जन्म घेत असतात. ती संकटे त्रास देऊन जाणारीच असतात.

अशा वेळेस माणूस हतबल झाला की त्याला मानसिक आधाराची गरज वाटते. त्या वेळी मात्र धार्मिक स्थळे मनाला खरोखरच आधार देतात. परंतु त्यामुळे संकटाची तीव्रता कमी होते का, हा प्रश्न महत्त्वाचा. आपल्याच कर्मबंधनातून सुख आणि दु:ख निर्माण होत राहतात. गंभीर काळात बुद्धीचा तोल जाणे आणि बुद्धीचा समतोल राखणे हीसुद्धा एक कला आहे. ती ज्याला साध्य झाली तो स्वत:च्या कर्मावर विश्वास ठेवू लागतो आणि तीच खरी अनुभूती असते. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक