शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

जग ब्रह्म रूप जाण! हेची साधुचे लक्षण!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 3:42 PM

ब्रह्मज्ञान मिळवून जो स्वतःचा उद्धार करतो पण इतर जीवाचा करीत नाही. त्याचे ज्ञान खरे नसून ते भंडपण आहे.

- हभप भरतबुवा रामदासी. बीड. 

मध्यम भक्ताची भक्ती ही उदात्त असते. त्याच्या अंतःकरणात भगवंताबद्दल अत्यंतिक प्रेम असते. भगवंताची भक्ती करणाऱ्या साधकाबद्दल मैत्रीपूर्ण भाव असतो. हे सगळे खरे असले तरी, मध्यम भक्ताची भक्ती ही फक्त आत्मोद्धाराच्या साधनेनेच चाललेली असते. समाजकल्याणाची किंवा समाज उद्धाराची तळमळ मध्यम भक्ताला मुळीच नसते. संत एकनाथ महाराज मध्यम भक्ताचे वर्णन करतांना म्हणतात; 

पावोनिया ब्रह्मज्ञान! स्वयें उद्धरी आपण! न करी जो दीनोध्दारण! हे भंडपण झाल्याचे!!

ब्रह्मज्ञान मिळवून जो स्वतःचा उद्धार करतो पण इतर जीवाचा करीत नाही. त्याचे ज्ञान खरे नसून ते भंडपण आहे. वैयक्तिक मोक्षाच्या मागे लागलेले योगी व समाजकल्याणाची तळमळ असणारे संत यांच्यात हाच मोठा फरक आहे. 

जग ब्रह्म रूप जाण! हेची साधुचे लक्षण!!

जगाला ब्रह्म रूप समजून जगातील प्राणिमात्रांकडे ब्रह्म भावाने बघणें हाच खरा भागवत धर्म आहे. ईश्वर सर्वत्र आहे या अद्वैत भुमीकेतून भक्तीची साधना केली तरच विश्वोद्धार व आत्मोद्धार होईल. सर्व भूतमात्रांमध्ये ईश्वरभाव ठेवून जो भक्ती करतो तोच उत्तम भक्त होय. उत्तम भक्तांचे लक्षण सांगतांना व्यास महाराज म्हणतात; 

न काम कर्म बीजानां यस्य चेतसि संभवः !वासुदेवैक निलयाःस वै भागवतोत्तमः!!

उत्तम भक्ताच्या चित्ताला राग, द्वेष, इर्षा, मोह, हर्ष, विषाद इ.विकार कधीच शिवत नाहीत.कारण त्याचे चित्त फक्त परमेश्वराचे ठिकाणीच स्थिर असते. त्यामुळे कुठलेही काम विकार उत्तम भक्ताला निर्माण होत नाहीत. काम नाही म्हणून त्या पासून निर्माण होणारे कर्म नाही. कारण कर्माला कारण असणारे  अज्ञानाचे बीजच नष्ट झालेले असते. उत्तम भक्त हा कर्म करून देखील अकर्मीच राहतो. भक्ती साधनेतून सर्व भूतमात्रात एक परमेश्वर भरलेला असल्याची त्याला प्रचिती आलेली असते. तुकाराम महाराज आपला स्वानुभव वर्णन करतात; 

विठ्ठल जळी स्थळी भरला! रिता ठाव नाही उरला! तो म्या दृष्टीने पाहिला! विठ्ठलाची विठ्ठलची !!

देव सर्वत्र आहे. सर्वांभूती आहे. त्या परमेश्वराला देश, काल, आणि वस्तु मर्यादा नाही. असा अमर्याद असणारा तो परमात्मा सर्वत्र व्यापून दशांगुले उरला आहे. उत्तम भक्ताला. .सर्वं विष्णुमयं जगत्. ...! हे ज्ञान झालेले असल्यामुळे त्याचे भेदाभेद संपलेले असतात. भगवान अर्जुनाला सांगतात; 

समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम्! न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् !!

समत्व प्राप्त झालेल्या भक्तालाच उत्तम भक्त असे म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात; 

जो सर्व भूतांचे ठायी ! द्वेषातें नेणेंचि कांही! आपपरू नाही!  चैतन्य जैसा!!

( लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क 8329878467 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक