शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नात्यांचे रेशीम बंध उलगडताना..... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 21:07 IST

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने पण का होईना माणसे माणसांमध्ये रमल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे

माणूस अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्याासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत धडपडत असतो. आयुष्य सुखाने जगता यावे तो बऱ्याच गोष्टींशी समझोता करत असतो. कधी आवडी निवडी तर कधी नाती... पण आयुष्य चैनेत जगण्याची स्वप्न उराशी बाळगून घड्याळाशी काट्याची टक्कर देताना तो कुटुंबाली वेळ देण्यास पण काचकुच करतो. मग रक्ताच्या नात्यात देखील समन्वयाचा अभाव जाणवू लागतो. संवादाची जागा वाद घेण्यास सुरुवात करतो. अशावेळी तुम्हांला वेळीच धोक्याचा इशारा समजून घेणे गरजेचे असतात. नाहीतर आयुष्यातला आनंदाचा रंग ऊडून जायला काहीवेळ लागत नाही. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने पण का होईना माणसे माणसांमध्ये रमल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.  अनेक वर्षांपासून तुटलेला संवादाचा पूल यामुळे जोडला जात आहे.  रक्ताच्या नात्यांमधील गोडवा पुन्हा वाढीस लागला आहे. विशेषत: गावाकडे अशाप्रकारची दृश्ये पाहावयास मिळत आहेत. पाच - दहा वर्षांपासून शिक्षण, नोकरी निमित्ताने पुण्या मुबंईत जाणाऱ्या व्यक्तीला घरातल्या माणसांकडून मायेची ऊब मिळाली आहे. 

कोरोनामुळे सध्या सर्वच शहरे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. यामुळे बाहेर गावावरून शिक्षण आणि नोकरीसाठी आलेल्या मुलामुलींना पुन्हा गावाकडचा रस्ता धरावा लागला आहे. अशात काहीजण आई वडिलांसोबत भांडण करून शहरात आपले नशीब आजमवण्यासाठी आले होते. पाच सहा वर्षांपासून गावाकडे जाणे झाले नाही. घरच्यांबरोबर अबोला कायम होता. मात्र अचानक लॉकडाऊन झाले आणि समोर गंभीर परिस्थिती उभी राहिली. दोन वेळच्या जेवणाचे हाल होऊ लागले. अशावेळी अनेकांनी पुन्हा आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे कित्येक वर्षांनंतर वडील आणि मुलाचा संवाद घडला. अशा घटना दिसून आल्या आहेत. याबाबत अनेकांनी आपले अनुभव व्यक्त केले आहेत.  लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आणि कंपनीत काम करणाऱ्यांना घरच्यांनी बोलवून घेतले. ते घरी पोहोचले आहेत. भाव-भाव, वडील मुलगा यांचे पटत नव्हते. मात्र, या संसर्गाच्या भीतीमुळे नात्यातील वाद मिटवून एकत्र आले आहेत. एकमेकांना समजून घेऊ लागले आहेत. भाऊच नाही तर भावकीतील लोक संपर्कात आले आहेत. रोजच्या धावपळीच्या जीवनात नातेवाईकजवळ आले असून, दररोज फोन, व्हिडिओ कॉल करून खुशाली जाणून घेत आहेत. काही लोक लॉकडाऊनमुळे गावी पोहोचू शकले नाही. ते शहरात असल्याने विशेष करून त्यांची काळजी गावाकडील लोक करत आहेत. गरज असेल तेव्हाच घरातून बाहेर निघा. अन्यथा घरातच राहा. घरातून बाहेर पडला तर काळजी घ्या. सोशल डिस्टेन्स पाळण्याचे आवाहन गावातील लोकांकडून करण्यात आहे. शहरात दोन हजारहून अधिक विद्यार्थी अडकले असून. त्यांचीही कुटुंबियांकडून काळजी घेण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेrelationshipरिलेशनशिपFamilyपरिवारcorona virusकोरोना वायरस बातम्या