शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

तीक्ष्ण बुद्धीला व्यवहार तर शुद्ध बुद्धीला परमार्थ कळतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 6:54 PM

तीक्ष्ण बुद्धीला व्यवहार कळतो, स्वार्थ कळतो पण परमार्थ कळेलच, असे नाही.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

परमेश्वर हा महान कलाकार आहे. मानवी देह हीच त्याची सर्वांत मोठी कलाकृती आहे. या देहाचा अंतर्मुख होऊन विचार केला तर मन अगदी थक्क होऊन जाते. या जगात अनेक माणसं जन्माला येतात आणि मरतात. प्रत्येकाचे चेहरे वेगळे, रंग वेगळे, हुबेहुब एकासारखा दुसरा असे किती लोक सापडतील..? निराकार भगवंताने एवढे आकार कसे निर्माण केले असतील..? मनुष्यदेह तरी ईश्वराने का निर्माण केला..? राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी म्हणतात -पशू देही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलतीया लागी नरदेह हीच प्राप्ती, भगवंताची करावीवास्तवात मानवदेह मिळणंच दुर्लभ आहे. पाप पुण्याचे पारडे समसमान झाले तरच हा देह मिळतो. आम्हाला मिळाला पण कळाला नाही. समर्थ रामदास म्हणतात-सांगा नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरलेते मूर्ख कैसे भ्रमले मायाजाळीपरमार्थ तर फक्त शुद्ध बुद्धीलाच कळतो. आजच्या प्रगतीच्या अश्वारोहणात माणूस खूप बुद्धीमान झाला. आपल्या बुद्धीच्या जोरावर तो सूर्यचंद्रावर पोहचला पण ही शुद्ध बुद्धी नाही. फार तर याला तीक्ष्ण बुद्धी म्हणता येईल. कारण शुद्ध बुद्धीलाच परमार्थ कळतो. तीक्ष्ण बुद्धीला व्यवहार कळतो, स्वार्थ कळतो पण परमार्थ कळेलच, असे नाही. जर शुद्ध बुद्धी नसेल तर जीव मायाजाळी गुरफटतो. माया ही जीवाला भगवंतापासून विन्मुख करते, उद्विग्न करते. माया ही छायेसारखी आहे. छायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. सूर्याच्या विरूद्ध दिशेला तोंड करून चाललो तर छायेचा अनुभव येतो. छायेच्या अनुभूतीचे कारण जशी सूर्याची विन्मुखता तसेच मायेच्या अनुभूतीचे कारण भगवंताची विन्मुखता. माया निर्मूलनाचा उपाय म्हणजे फक्त भगवत्सन्मुखता आहे. अशी सन्मुखता प्राप्त करणे म्हणजेच शुद्ध बुद्धी होय व त्यासाठी तर हा मनुष्य देह आहे..! समर्थ रामदास स्वामी म्हणतात-या नरदेहाचेनि आधारे, नाना साधनाचेनि द्वारेमुख्य सारासार विचारे बहुत सुटलेअग्नी हा अन्नही शिजवतो व घरही जाळतो. आपण त्याचा उपयोग घर जाळण्यासाठी करायचा का अन्न शिजवण्यासाठी करायचा.? हे विवेकबुद्धीने ठरवावे..! आणि हे कळणे म्हणजेच शुद्ध बुद्धी होय.

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांच्या संपर्क क्रमांक 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिकcultureसांस्कृतिक