शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

Mahashivratri : महादेवाची पूजा करताना बेलपत्र का अर्पण करतात? जाणून घ्या कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 10:02 AM

महाशिवरात्रीला भगवान महादेवाला वेगवेगळ्या गोष्टींसह बेलपत्रही अर्पण केलं जातं. पण याचं कारण अनेकांना माहीत नसतं. तेच कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

(Image Credit : Social Media)

महाशिवरात्रीचा उत्सव देशभरात साजरा केला जात आहे. भाविक भगवान शिवाची पूजा-अर्चना करून महादेवाला प्रसन्न केलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. भाविक या दिवशी पूजा करताना महादेवाच्या पिंडिवर बेलपत्र वाहतात. पण हे का वाहतात याचं कारण अनेकांना माहीत नसतं. याबाबत काही आख्यायिका आहेत.

काय आहे कारण?

(Image Credit : Social Media)

हिंदू पुराणांमधील एक प्रचलित कथा आहे. या कथेनुसार, समुद्र मंथनावेळी जेव्हा अमृतसाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू झाले होते. त्यावेळी अमृताआधी समुद्रातून कालकूट नावाचं विष निघालं होतं. या विषाने संपूर्ण ब्रम्हांड नष्ट झालं असतं. हे विष केवळ भगवान महादेवच नष्ट करू शकत होते. तेव्हा भगवान महादेवाने कालकूट विष आपल्या कंठात ठेवलं होतं. यामुळेच त्यांचा कंठ निळा झाला होता. त्यामुळेच त्यांचं नाव नीलकंठ पडलं होतं.

(Image Credit : YouTube)

पण या विषामुळे भगवान शिवाचं डोकं गरम होऊ लागलं होतं आणि त्यांच्या कंठात जळजळ होऊ लागली होती. त्यांना होणारा हा त्रास पाहून देव चिंतेत होते. त्यांच्या कंठाची जळजळ कमी करण्यासाठी सर्वच देवतांनी त्यांना बेलपत्र खायला दिलं. ज्यामुळे विषाचा प्रभाव कमी झाला. तेव्हापासून भगवान शिवाच्या पूजेत बेलपत्राला महत्व आहे. असे मानले जाते की, जे लोक भगवान शिवाला बेलपत्र वाहतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात.

महाशिवरात्रीचं महत्व

अशी मान्यता आहे की,  काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल(विष) याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता. महाशिवरात्री विषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला ‘जलरात्री’ देखील संबोधतात. महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीReligious programmeधार्मिक कार्यक्रमIndian Festivalsभारतीय सण