शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

मानवी जीवनाच्या संपन्नतेचा मूलमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 6:22 AM

केवळ रोग, आजाररहित असणे म्हणजे आरोग्य नव्हे. जेव्हा तुमचे शरीर, तुमचे मन, तुमच्या भावना आणि तुमची ऊर्जा यांत उत्तम समन्वय असतो आणि जेव्हा तुम्ही आतून परिपूर्णता अनुभवता तेव्हाच तुम्हाला खरोखर आरोग्यदायी वाटते.

- सद्गुरू जग्गी वासुदेवकेवळ रोग, आजाररहित असणे म्हणजे आरोग्य नव्हे. जेव्हा तुमचे शरीर, तुमचे मन, तुमच्या भावना आणि तुमची ऊर्जा यांत उत्तम समन्वय असतो आणि जेव्हा तुम्ही आतून परिपूर्णता अनुभवता तेव्हाच तुम्हाला खरोखर आरोग्यदायी वाटते. आज जगात पुष्कळ लोक वैद्यकीयदृष्ट्या जरी रोगमुक्त असले तरी वास्तविकपणे सहसा ते आरोग्यवंत नसतात. त्यांना औषधांची गरज नसेलही पण त्यांची संपूर्ण शरीरप्रणाली परिपूर्णता अनुभवत नाही. त्यांच्यात शांती, समाधान आणि आनंदाचा अभाव असतो. तुम्हाला वाटते की नैराश्याची एक ठरावीक सीमा पार केल्यानंतरच तुम्ही स्वत:ला आजारी समजत असाल, पण मी म्हणतो जर तुम्ही आनंदाने प्रफुल्लित नसाल तर एक प्रकारे तुम्ही आजारीच आहात. म्हणजे तुमच्यात आंतरिक समन्वय आणि समतोल याचा अभाव आहे. असे घडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही कधी याकडे लक्षच दिले नाही.सर्वकाही बाहेरून दुरुस्त करण्याची मनोवृत्ती अगोदर तुम्ही सोडून द्यावी. कुठलाही डॉक्टर किंवा औषध तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा तुम्हाला ते त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडीफार मदत करू शकतात, पण आरोग्य हे आतून घडतं आणि घडायला हवं. आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक पातळीशी निगडित नाही. आज आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणते की, मानव म्हणजे शरीर आणि मन यांचे समान संमिश्रण आहे.जे काही मनात घडतं त्याचे परिणाम शरीरावर दिसून येतात. जे काही शरीरात घडतं त्याचे परिणाम मनावर दिसून येतात. म्हणून आपली जीवन जगण्याची पद्धत, आपली मनोवृत्ती, आपल्या भावना, आपली मूलभूत मानसिक स्थिती, दैनंदिन कार्य सक्रियता, मनाची सूत्रबद्धता एकूण या सर्व गोष्टी उत्तम आरोग्याशी संबंधित आहेत. आरोग्य जर आपल्या आतून निर्माण व्हायचं असेल तर आपल्याला नक्कीच आपल्या आत थोडं आंतरिक इंजिनीअरिंग करावं लागेल. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक