शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

अंतरंगातच आनंदाचा ‘डोह’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:19 PM

आतूनच सागराच्या लाटांसारखा सर्वकाळ हेलावणारा आनंद ज्यानं त्यानं आतच उपभोगायचा असतो. अनुभवायचा असतो. आनंद प्रत्येकाच्या अंतरंगात असतो!

 पशुपक्षी वनस्पती यांना या आनंदाची जाणीव नसते. परिचय नसतो. पण मानवाच्या बाबतीत आनंद मिळवणं, आनंदात राहणं, आनंदी असणं आणि जगणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. यासाठी बाहेरचे प्रयत्न नकोत. आतूनच सागराच्या लाटांसारखा सर्वकाळ हेलावणारा आनंद ज्यानं त्यानं आतच उपभोगायचा असतो. अनुभवायचा असतो. आनंद प्रत्येकाच्या अंतरंगात असतो!

 जसा, सुखी माणसाचा सदरा बाजारात विकत नाही मिळत. तो तर प्रत्येकाकडेच असतो, पण तो शोधावा लागतो. तसेच आनंदाचे आहे.  आनंद निर्माण करता येतो, पण तो निर्माण करणं म्हणजे उत्पादन नव्हे, ती वस्तू नाही. ती अमूर्त कल्पना आहे. ती जाणवते, अनुभवता येते, ती प्रकट होते, डोळ्यांतून उमटते, आणि चेहºयावर हसू फुलवते.

  ‘स्वत:साठी जगलास तर मेलास. इतरांसाठी मेलास तर जगलास.’ अर्थातच,  आपल्या स्वत:पलीकडेही एक जग असतं. तेच आपलं विश्व असतं. समाजात, आनंदाला पारखे झालेले अनेक दु:खी जीव भोवताली असतात. त्यांच्या जगण्याची स्वप्नं तुटलेली असतात. कधी समाजाकडून ती अव्हेरली जातात.

 पानगळीसारखा एकेक अवयव झडल्याचं दु:ख काहींच्या वाट्याला येतं. आज माणसं अधिकाधिक आत्मकेंद्रित बनत चालली आहेत. इतरांसाठी जगण्यातला आनंद त्यांना अनुभवता येत नाही. मात्र, प्राथनेसाठी जोडणाºया दोन हातांपेक्षा मदतीसाठी पुढे केलेल्या एका हाताने इतरांना मदत केली जाऊ शकते. इतरांच्या मदतीतून स्वत:च्या अंतरंगात आनंदाचा डोह निर्माण केल्या जाऊ शकतो. 

आनंदाचा डोह आपल्यापाशीच असतो. इतरांसाठी काही करण्यातून आनंदाचे क्षण जिवंत करता येतात. त्या आनंदाला सीमा नसते. तो वर्णनातीत असतो. आनंद हे परमेश्वराचं स्वरूप आहे. सतचितआनंद असं त्याचं वर्णन, म्हणजे अनुभव आहे. जो आनंद ज्याला त्याला प्रत्येकाला ‘स्वत:च’ घ्यायचा असतो. तो सगळीकडे सदैव उसळतो, ओसंडत असतो. 

ठायीच बैसोनि करा एकचित्ते 

आवडी भगवंत आळवावा ॥

इकडे तिकडे भटकून समाधान, शांती कधीही लाभणार नाही. समर्थांचं मार्गदर्शन या दृष्टीनं मोलाचं आहे. ‘मनाचे श्लोक’मध्ये ते सांगतात-

बहु हिंडता सौख्य होणार नाहीे

शिणावे परी नातुडे हीत काही ॥

अर्थातच : सदासर्वत्र भटकण्यानं, विविध तीर्थक्षेत्रांना भेटी, व्रतवैकल्याचे संकल्प केल्यानं कुणाचंही हित होणार नाही. शीण मात्र येईल, पैसा-शक्ती-वेळ खर्च झाल्यानं एकप्रकारची क्षीणता, अशक्तता मनाला येईल. असलं दुबळं मन काय कामाचं? आजकाल लोक चारोधाम-अष्टविनायक-बारा ज्योर्तिलिंग-नर्मदा परिक्रमा अशा अनेक यात्रा करतात. खरं तर ती तीर्थयात्रा कमी नि पर्यटन (भ्रमण) अधिक असा प्रकार असतो. अशा यात्रींना अनुभवही तसाच येतो.

गंगेच्या पाण्यात डुबकी मारून तिला आपला एखादा विकार, वाईट सवय अर्पण करून स्वत: सुधारणं हा खरा उद्देश असतो. पण यासाठी शुद्ध मन, पवित्र भाव नि तीव्र इच्छाशक्ती हवी. त्यापेक्षा अंतरंगीची उपासना केली तर अंतयार्मीचा आनंदरूप परमेश्वर आतच भेटतो नि अपार आनंद आपल्या जीवनात-वर्तनात व्यक्त होऊ लागतो.

- श्री राधे राधे महाराज, बर्डेश्वर महादेव संस्थान, तरवाडी ता. नांदुरा, जि. बुलडाणा

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक