शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - कल्पनेचे देव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 04:08 IST

अननदेवी-देवतांच्या कल्पनेचे उदंड पीक तसे इथे हजारो वर्षांपासून आलेय; पण त्याचा खरा सुळसुळाट झाला, तो मध्ययुगीन कालखंडात जेव्हा माणसे आपली बुद्धी दगडाच्या देवाच्या पायांजवळ गहाण टाकीत होते.

प्रा. शिवाजीराव भुकेले

जेव्हा माणसातील दुर्गुणांची संख्या हळूहळू कमी होऊन तो सद्गुणांच्या आचरणामध्ये आत्मानंद मानू लागतो, तेव्हा त्याची वाटचाल ‘देव माणूस’ या संज्ञेकडे होते आणि हाच देवमाणूस अंधारात चाचपडणाऱ्या समाजास जेव्हा सन्मार्गाचा उजेड दाखवितो, तेव्हा त्याची वाटचाल देवत्वाकडे होते. खरं तर देवताची खरी संकल्पना माणसाने विकार टाकून विवेक ग्रहण करावा, या सत्याशी निगडित आहे; पण आपल्याकडे मात्र देवत्वाची कल्पना अवतार कल्पनेशी जोडली गेल्यामुळे भारतासारख्या खंडप्राय देशात बाकीचे काही नाही पिकले तरी चालेल, पण देवांचे पीक मात्र एवढे पिकले आहे की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देवांनी माणसांसाठी कुठला कोपरा रिकामा ठेवलाच नाही. जिथे जागा मिळेल, तेथे प्रार्थनास्थळ उभारून देव उभा केला जातो. त्यांना वेगवेगळी नावे आणि रूपे बहाल केली जातात. प्रार्थनास्थळ उभारण्याआधीच दगडाला शेंदूर फासून त्याची सुरुवात होते. माणसात देव पाहण्यापेक्षा दगडात देव पाहिला जातो.

अननदेवी-देवतांच्या कल्पनेचे उदंड पीक तसे इथे हजारो वर्षांपासून आलेय; पण त्याचा खरा सुळसुळाट झाला, तो मध्ययुगीन कालखंडात जेव्हा माणसे आपली बुद्धी दगडाच्या देवाच्या पायांजवळ गहाण टाकीत होते. या देवाच्या नावावर मग अनेक मागण्याही भक्तांकडून होऊ लागल्या. तेव्हा संत नामदेवासारखे आंतरभारतीचे जनक या समाजाला बुद्धिनिष्ठ प्रश्न विचारित होते,देव दगडाचा भक्त मावेचा। संदेह दोघांचा फिटे कैसा।ऐसे देव तेही फोडीले तुरकीं। घातले उदकीं बोभातींना।।पाषाणांच्या आणि तथाकथित कल्पनेच्या पाठीमागे लागलेल्या देवांच्या पाठीमागे व पुढे मायावी भक्तांची तोबा गर्दी होते. आपल्या इच्छेसाठी देवांना ‘साकडे’ घालू लागतात अन् निर्लज्ज देवसुद्धा बोकडे मागू लागतात, अशा बुद्धिभ्रष्टांना नामदेवांनी विचारले आहे, अरे! तुमच्या कल्पना जगतातल्या या ‘पाषाणांना जेव्हा यवनांनी तोडून-फोडून टाकले, काहींना उचलून पाण्यात फेकून दिले, तेव्हा हे सारे देव त्यांच्या मानगुटीवर का बसले नाहीत? या देवांना मुक्त करण्यासाठी नंतर माणसातला देव शिवाजी राजाच जन्माला यावा लागला. ज्या देवी-देवतांना स्वत:चेच रक्षण करता येत नाही, ते आमचे रक्षण काय करणार? पण टिळे, टोप्या, वस्त्र, सोहळे, महाअभिषके आणि महानैवेद्याच्या नावाखाली आम्ही दगडाच्या देवाला खूश करण्यासाठी जिवंत माणसाला नागवीत आहोत. नवसाच्या नावावर देव खपविले जाऊ लागले. नवसाला पावतो, अशी ज्या देवाची प्रसिद्धी तेथेच भाविकांची गर्दी वाढताना दिसते. मग देवी-देवतांमध्येही गटबाजी मनुष्यच पाडू लागला. नवसाला पावणारा आणि न पावणारा देव अशी वर्गवारी मनुष्य मनातच करू लागला. आपल्याला हवे ते आपल्या पदरी थेट देव कसे टाकेल, याचीव स्वप्ने पाहिली जातात. इथे माणसे मृत्युपंथाला लागली आहेत आणि पाखंडी देवाच्या कल्पना स्वर्गसुखाच्या ‘वाकुल्या’ दाखवीत आहे. अशा वेळी विवेकी समाजाचे शिल्पकार महात्मा फुले म्हणतात,कल्पनेचे देव कोरिले उदंड, रचिले पाखांड जगामाजी।किन्नर-गंधर्व ग्रंथी नाचविले, अज्ञ फसविले कृत्रिमाने।। देवत्वाचा खरा अर्थ न समजलेले भाविक मंदिरातच गर्दी करू लागतात. खरा देव आणि त्याची देवपूजा कशी असते, ते न समजलेले भक्तच प्रार्थनास्थळी भलतीच धांदल उडवू लागले. नेमके देवत्व म्हणजे काय, हे समजेल तोच खरा भक्त.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक