शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

मन:शांती -  नैतिक मर्यादांचे पालन.. आनंदाला उधाण..!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 21:28 IST

मनावर संयम ठेवून नैतिक मूल्यांची जोड देऊन सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर जीवन सुखी व समृद्ध होते.

चौदा वर्षांच्या रमेशला मोबाईल गेमचे व्यसन लागले होते. वडिलांनी मोबार्इ$ल हिसकावून अभ्यास करावयास सांगितले, तर रागाच्या भरात रमेशने आत्महत्या केली. पुण्यात नुकत्याच घडलेल्याया घटनेवर खूप गंभीर विचारमंथनाची गरज आहे. प्रतिभा ही कॉन्व्हेंटमधून शिक्षण घेतलेली विवाहित तरुणी. मित्रांना हस्तांदोलन करणे, सहलीला जाणे, मित्रांशी अरे-तुरे बोलणे यांसारख्या मुक्त वातावरणात वाढलेली. तिने हाफ स्लिव्हचा टी-शर्ट घातलेला, स्वत:चा सुंदर हसरा फोटो फेसबुकवर लोड केला. त्याला आलेल्या कमेंट्स वाचून प्रतिभाच्या पतिराजांचा पारा खूपच चढला. तुफान भांडणे, आरोप-प्रत्यारोप, शिवीगाळ... आज प्रतिभा माहेरी निघून आलेली आहे. ऐश्वर्यसंपन्न कुटुंबातील प्रत्येकाला बंगल्यात स्वतंत्र खोली. टुमदार बंगला टोपेसाहेबांनी बांधला खरा, परंतु एकुलत्या एका मुलाला त्याच्या बेडरूममध्ये इंटरनेटवर तो काय पाहतोय, याकडे आई-बाबांचे दुर्लक्ष. विशाल नेटवर अश्लील साईट्स पाहता पाहता घरात पैशांची चोरी करीत वाममार्गाला लागला. विविध आजारही ओढवून घेतले. यातून खचल्यामुळे त्याला मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार सुरू आहेत. नैराश्याने पछाडलेली मेधा ध्यानवर्गासाठी आली होती. दिवसभर पती आॅफिसला गेले, की घरात वेळ जात नाही म्हणून नेटवर बसायची. चॅटिंग करता करता तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असणारा मुलगा तिच्यात फार गुंतला, हे कळल्यावर मेधाच्या पतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला. मेधा आज नैराश्याने ग्रासली आहे. आत्महत्येचे विचार तिला सतावतात. मोबाईल, इंटरनेट या खऱ्या गरजेच्या व उपयुक्त अशा गोष्टी. यामुळे ज्ञानवृद्धी, जवळीक, प्रसिद्धी, व्यवसायवृद्धी, वेळेची बचत, जलद संवाद, ओळखी यांसारख्या अनेक गोष्टी साधल्यामुळे जीवन सुखी व समृद्ध होते. मनावर संयम ठेवून नैतिक मूल्यांची जोड देऊन यांचा योग्य वापर केला तर तुम्हाला खूप मदत मिळते, पण मर्यादा न पाळता सीमारेषा ओलांडली तर मात्र आयुष्य कष्टमय व दु:खमय होण्याची दाट शक्यता असते. बंगळुरू हे आयटी पार्क शहर. या शहरात मागील वर्षी इंटरनेट व मोबाईलच्या अति व असुरक्षित वापरामुळे ४,१९२ घटस्फोटांचे दावे न्यायालयात दाखल झाले आहेत. केरळमध्ये तज्ज्ञांच्या मते २५ टक्के घटस्फोटांचे दावे हे आयटी क्षेत्रातील तरुण-तरुणींचे आहेत. भारत हा फेसबुकच्या वापरात दुसºया क्रमांकावर असून १२५ कोटी लोक याचा वापर करीत आहेत. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू आहेत. आज तरुण पिढीने नेटचा वापर हा चांगल्या गोष्टींसाठी करताना मनावर बंधने घालून वेळेचे भान ठेवावे. चॅटिंग करताना सावधानता बाळगावी, पालकांनी आवश्यक त्या साईट्स ओपन ठेवून बाकी घातक अशा साईट्स ब्लॉक कराव्यात. मुले नेट वापरताना दूरून लक्ष ठेवावे.

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाMeditationसाधना