शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

Ganesh chaturthi Special : अशी झाली गणेशोत्सवाला सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 4:27 PM

गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण देशभरात मोठ्या भक्तीभावाने गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. यावर्षी 13 ते 23 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण देशभरात मोठ्या भक्तीभावाने गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. यावर्षी 13 ते 23 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 10 दिवसांच्या या उत्सवादरम्यान भक्तांच्या श्रद्धेनुसार, दीड, तीन, पाच, सात किंवा मग अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचं धुमधड्याक्यात विसर्जन करण्यात येतं. पण तुम्हाला माहिती आहे का? खरी गणेशोत्सवाची सुरुवात कधीपासून झाली? आणि कोणी सुरूवात केली?

पेशवाईमध्ये झाली होती गणेशोत्सवाची सुरुवात 

10 दिवसांचा गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. यामागील कारण म्हणजे या महोत्सवाची सुरुवातही महाराष्ट्रातून झाली होती. याबाबत इतिहासामध्ये वळून पाहिलं की असं दिसून येतं की, भारतात पेशवाईमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येत असे. पेशवे मोठ्या उत्साहात गणपतीचं स्वागत करत असत. 

असं म्हटलं जातं की, सवाई माधवराव पेशव्यांच्या काळापासूनच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवसापासून 10 दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. पेशवे काळात शनिवार वाड्यामध्ये 10 दिवसांच्या उत्सवाचं आयोजन करण्यात येत असे. परंतु त्यानंतर ब्रिटिशांनी पेशवाईवर ताबा मिळवला त्यानंतर गणेशोत्सवाचा उत्साह कमी झाला. 

तरिही गणेशोत्सवाची परंपरा मात्र सुरूच राहीली. मात्र ब्रिटिशांच्या शासन काळामध्ये हळूहळू हिन्दू राज्यांमध्ये फूट पडू लागली. त्यानंतर भावनात्मक आणि धार्मिक गोष्टींमध्येही फूट दिसून येत राहिली. 

ब्रिटिशांच्या काळातील गणेशोत्सव

ब्रिटिशांच्या काळामध्ये दुरावलेल्या भारतीयांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी एक शक्कल लढविली. त्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिले. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवसांपासून पुढील 10 दिवसांपर्यंत गणपती बसवला जाऊ लागला. त्यानंतर 11व्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचं विसर्जन करण्यात येऊ लागलं. 1893 रोजी पहिल्यांदा ब्रिटिशांच्या काळामध्ये गणेशोत्सव साजर करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत गणेशोत्सव फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊ लागला. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८