शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
5
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
6
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
7
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
8
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
9
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
10
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
11
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
12
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
13
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
14
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
15
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
16
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
17
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
18
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
19
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
20
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
Daily Top 2Weekly Top 5

भूतकाळाला वर्तमानाची जागा अडवू देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 18:27 IST

माणसे भूतकाळात रममाण होऊन वर्तमान व भविष्य दोन्ही दुःखात परावर्तीत करत आहेत.

माणसे भूतकाळात रममाण होऊन वर्तमान व भविष्य दोन्ही दुःखात परावर्तीत करत आहेत. भूतकाळातील अपयशावर वर्तमानकाळाच्या यशाने फुंकर घालून भविष्य उज्वल करण्याची कला आत्मसात केली पाहिजे.

माझा तो स्वभाव आहे अनावर ।तुज देता भार काही नोव्हे ।।

जुन्या पिढीतील काही व्यक्ती नव्यांना कटू आठवणीत ओढतात. व अश्वत्थामाच्या भळभळत्या जखमा प्रमाणे आयुष्यभर त्याचेच व्रण अंगावर बाळगतात. सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या घरात रोज श्लोक पाठ करून आजोबांना व आजींना म्हणून दाखवायची शिस्त होती. तेव्हा कंटाळा यायचा. मी नाही म्हणायचो श्लोक . तेव्हा आजोबा रागवायचे मग मी शिल्लक राहिलेले सर्व श्लोक देखील पाठ करून म्हणून दाखवायचो. मग आई नेहमी तिचे ठेवणीतील वाक्य म्हणायची 'बूँद से गयी वो हौद से नही आती' तो बुंद एकदा मनातून पडला की तोच लक्षात राहतो. नंतर कितीही मोठा हौद बांधला तरी उपयोग काय ?  काय म्हणायचं या मानवी स्वभावाला.

संत तुकाराम महाराजांनी देव आणि प्रारब्ध याबाबत उपदेश करताना म्हटले आहे.

देह तव आहे प्रारब्ध अधीन ।याचा मी कांधीन वाहू भार ।।

काय तुझी ऐसी वेचत एक गाठोडे या उक्तीप्रमाणे मानवी मन भूतकाळाची गाठोडे घेऊन फिरत असतो. काही वर्षांपूर्वीचा प्रसंग, एका गृहस्थांशी संभाषण बंद झालेलं होतं. जेव्हा जेव्हा तो व्यक्ती दिसतो तेव्हा आपल्याला तोच प्रसंग आठवतो. कटू आठवणी अगदी अधिकच घट्ट होत जाते.या काही वर्षात माणसं बदललेली असू शकतात. हा विचार करणे एवढेच उदार आपण नसतो. म्हणून कटू आठवणी तिथे सोडून देणे हाच उत्तम उपाय असतो. ती कुरवाळत ठेवू नये. आपल सुदैव की आपण खूप जुनी भरणारी जखम वागवत फिरणारा अश्वस्थामा नाही. जखम अंगावर, मनावर ताजी ठेवण्याचा ते त्यालाच माहीत. दुःख काय असतं ते त्यालाच माहित त्याला तो शाप आहे. पण आपल्याला तरी अशी शक्ती नाही. मग अश्वत्थामाच दुःख विनाकारण का मागून घ्यायचं?

आयुष्याच्या पटलावरून वाईट गोष्टी पुसून टाकून नवीन आठवणींना जागा उपलब्ध करून द्यायला हवी. मनाला त्रास देणाऱ्या आठवणी तर जाणीपूर्वक पुसून टाकायला हव्यात. स्मृतिकोशात काय ठेवायचं आहे ज्याला समजलले तोच खरा विवेकी. भूतकाळाला वर्तमानाची जागा अडवून देऊ नये. येस्टरडे इज हिस्टरी, टूमारो इज मिस्ट्री, टुडे इज द गिफ्ट फ्रॉम द लॉर्ड, हेंस इट इज कॉल्ड द प्रेसेंट. रात्री झोपताना आपण टोचणारी अलंकार जसे काढून ठेवतो. तश्याच टोचणार्या आठवणीही मनातून काढून ठेवाव्यात. आणि दुसऱ्या दिवशी फक्त अलंकार घालावेत. प्रत्येक सकाळी तन आणि मन मोकळे स्वच्छ निर्मळ असेल तरच आपणास हेवा वाटेल.

- डॉ. भालचंद्र संगनवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातुर

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक