दुर्गुण हेच विनाशाचे कारण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:53 IST2019-03-09T18:52:45+5:302019-03-09T18:53:15+5:30
दुसºयाचे दुर्गुण पाहण्याच्या चुकीच्या सवयीमुळे माणूस आपल्या आणि समाजाच्या विनाशाचे कारण बनतो.

दुर्गुण हेच विनाशाचे कारण!
माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला दुसºयाचा चांगुलपणा एकवेळ दिसणार नाही, परंतु दुसºयातील दुर्गुण लगेच दिसतील. स्वत:मध्ये कितीही दुर्गुण असले तरी त्याला फक्त स्वत:चा चांगुलपणा आणि दुसºयांचे दुर्गुण नेहमीच दिसतात. दुसºयाचे दुर्गुण पाहण्याच्या चुकीच्या सवयीमुळे माणूस आपल्या आणि समाजाच्या विनाशाचे कारण बनतो.
दुर्गुणामुळे मनुष्य आई-वडील, बहीण- भाऊ इतकेच नव्हे तर गुरूपासूनही दुरावतो. स्वत:मध्ये अनेक दोष असतानाही मनुष्य इतरांचे दोष पाहत बसतो. प्रत्येकाच्या मनात, हृदयात आणि अंत:करणात डोकावून पाहिले की, कुणातही काही ना काही ऐब दिसून येतील. कुणाच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष आहेत. मात्र, तीच कृती स्वत:वर केल्यास दुसºयाच्या अंतकरणात दिसणारे दोष स्वत:च्याही अंतकरणात आणि मनात निश्चितच दिसतात. स्वत:मध्येही अनेक उणिवा जाणवतात. त्यामुळे दोष पाहण्याची कृती स्वत: आणि स्वत:च्या मनापासून केल्यास आपणाला कुणातही दोष दिसून येणार नाहीत. इतरांच्या मनाच दर्पणात डोकावून पाहण्यापेक्षा स्वत:च्या मनात डोकावून पाहील्यास आपणाला इतरांमधील दुर्गुण दिसणार नाहीत. मन चक्षू दुसºयांचे नव्हे तर आपलेच दुर्गुण पाहण्यासाठी आहेत. दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलात आणि नको तितका वेळ खर्च केलास तर आपलंच अहीत होते. या उलट स्वत:च्या मन चक्षूने स्वत:चेच अवलोकन केले असते तर आपल्यातील दुर्गुण नक्कीच सुधारता येतात. मात्र, प्रत्येक मुनष्याची ... मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही.
- शुभांगी नेमाने
शिक्षिका, जागृती ज्ञानपीठ, आंबेटाकळी ता. खामगाव.