शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म - कुछ तो लोग कहेंगे... लोगों का काम है कहना..!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 19:29 IST

आपण आपली कर्तव्ये मनापासून -नीतीने पार पाडायची. बाकी सर्व कर्माच्या गतीवर अवलंबून असते...

 -डॉ. दत्ता कोहिनकर-अशोक व मुक्ता दोघेही कर्तव्यदक्ष, प्रेमळ, नीतिमान दाम्पत्य..मुक्ता अशोकला विनवणी करून ध्यान केंद्रावर घेऊन आली होती. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अशोकला आलेले नैराश्य व त्याची कारणे लक्षात आली. अशोक सरकारी अधिकारी, कामात अत्यंत चोख व नीतिमान असल्याने महाराष्ट्र शासनातर्फे त्याचा गौरव झाला होता. घर, पैसा, आरोग्य, सुबत्ता, सामाजिक प्रतिष्ठा सर्व काही सुरळीत चालले होते. मुलामुलीला चांगल्या शाळेत टाकून उत्तम संस्कार केले जात होते. पण दहावीनंतर मुलाने अचानक गाड्या चोरणे, मारामाऱ्या करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे सुरु केले. बऱ्याचदा चोरीच्या प्रकरणात वर्तमानपत्रात त्याच्या ठळक बातम्या, चौकीवरचे बोलावणे, कोर्टकचेरी यामुळे अशोक खूपच खचला. समाजात सगळीकडे अवहेलना व नातेवाईक काय म्हणत असतील? या विचाराने त्याला नैराश्य आले. त्यातच एकुलत्या एका मुलीच्या प्रेमप्रकरणाची वार्ता त्याच्या कानी आली. समाजात कस तोंड दाखवू - लोक काय म्हणतील या नकारात्मक भावनांशी पुन्हा पुन्हा समरस होत तो नकारात्मक तरंगाशी कनेक्ट होऊन उदासी, बैचेनी व नैराश्यात जायचा. खरोखर मित्रांनो म्हणतात ना. सबसे बडा रोग - क्या कहेंगे लोग.. माणूस समाजाला खूपच भीत असतो. अशोकशी झालेल्या चर्चेनंतर त्याने मुलगा व मुलगी यांच्याप्रती वडील या नात्याने असलेली कर्तव्ये पूर्णत: व्यवस्थित पार पाडली होती. त्यात तसूभरही कमी केले नव्हते. चांगल्या संस्कारांची पेरणी त्या दोहोंनी मुलांवर भरपूर केली होती. पण बी दगडावर पडल्याने त्याला अंकुर फुटत नव्हते...      काही वेळेस आपण सर्व काही प्रयत्न करूनही अपेक्षित गोष्टी घडत नाही व सहजपणे अनपेक्षित गोष्टी घडतात. येथे कर्मफल सिध्दांताचे समीकरण जुळते. कर्मफल सिध्दांतानुसार *आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती हया जर आपण त्यांना गतजन्मांच्या प्रवासात सुख दिले नसेल तर सुख देण्यासाठी किंवा दु:ख -त्रास दिला असेल तर बदला घेण्यासाठीच येत असतात*. अशोकच्या कर्मफल सिध्दांतानुसार पालक म्हणून सर्व कर्तव्ये पूर्ण करत असताना देखील अशाप्रकारे मुलाने वर्तणुक करून -बदनामी केली. या कृतीला आपल्याच कर्माचे फळ म्हणून सहजपणे स्वीकारण्याचे व स्वत:ची हानी न करून घेण्याचे मर्म चर्चेतून अशोकला उमगले व मनाची सबलता व निर्मलता वाढवण्यासाठी तो शिबिरास बसायला तयार झाला.    कर्माच्या गहनतेचे वर्णन करताना श्रीकृष्णाचा मित्र भक्त सुदामा म्हणतो की ... कर्माची गती खरोखर अति गहन । आम्ही दोघे एकाच गुरूचे शिष्य, पण तो कृष्ण झाला पृथ्वीपती। माझ्या घरात खायला नाही माती गोस्वामी तुलसीदास सांगतात...कर्म प्रधान विश्व करि राखा । जो कस करई सो तस फल चाखा कोणत्याही मातापित्याच्या पोटी जन्म घ्यायचा हे जर आपल्या हातात असते तर प्रत्येकाने टाटा-बिर्ला यांच्या कुळातच जन्म घेणे पसंत केले असते. प्रारब्धानुसार स्त्री-पुत्र-नातलग एकच येतात. सुख-दु:ख देतात, ॠणानुबंध संपले की विभक्त होतात. काही वर्षांपूर्वी कोकणात अतिवृष्टी झाली तेव्हा करोडोपती सरकारी भोजनाच्या रांगेत उभे होते. संजय गांधी - प्रमोद महाजन यांचा किती अचानक अंत झाला. या जगात सर्व काही आपल्या कर्मानेच घडते. अंबाने शिखंडीचा जन्म घेतला तो भीष्मांना मारण्यासाठीच. आई-वडिलांमुळे रामाला वनवासात जावे लागले. अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकला की लक्षात येते आपण आपली कर्तव्ये मनापासून -नीतीने पार पाडायची. बाकी सर्व कर्माच्या गतीवर अवलंबून असते. त्यामुळे हे माझ्याच गतकर्माचे फळ-त्याचा विपाक आनंदाने स्वीकारून मनाची समता ठेवायची व दुष्कर्म व स्वत:ची हानी टाळायची. लोक काय म्हणतील यावर जास्त विचारमंथन न करता आनंदी रहायचे. गौतम बुद्ध म्हणाले, ज्याची निंदा व अवहेलना होत नाही असा कोणीही सापडणे शक्य नाही. म्हणून निंदेला - अवहेलनेला घाबरू नका, आपण शीलपालन - नैतिकता जपत आपली सर्व कर्तव्ये -मनुष्यधर्म व्यवस्थित पार पाडत आहोत ना हे अंर्तमनाने जाणा व समाज काय म्हणेन म्हणून स्वत:ला मानसिक त्रास करून घेऊ नका. वर्तमानात सत्कर्म करून भविष्य उज्ज्वल करणे हे मात्र आपल्या हातात असते. भविष्य उज्ज्वल करण्यासाठी वर्तमानकाळात शील-समाधी-प्रज्ञा (यम-नियम) चा अभ्यास करा. शेवटी निंदा करणे हा एक मनुष्यस्वभावच असतो.  *कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोडो बेकार की बाते - कही बीत न जाये रैना*                     

 ( लेखक प्रसिद्ध व्याख्याते आहे. )   ........................

टॅग्स :PuneपुणेMeditationसाधना