कसारा घाटातील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:46 AM2018-03-18T00:46:31+5:302018-03-18T00:46:31+5:30

नालासोपारा शहरातील आचोळे गावातील चौधरी कुुटुंबावर शुक्रवारी काळाने घाला घातला. त्यांच्या गाडीला कसारा घाटात झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण अत्यवस्थ आहेत.

Death of three family members in accident in Kasra Ghat | कसारा घाटातील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कसारा घाटातील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Next

वसई : नालासोपारा शहरातील आचोळे गावातील चौधरी कुुटुंबावर शुक्रवारी काळाने घाला घातला. त्यांच्या गाडीला कसारा घाटात झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण अत्यवस्थ आहेत. शुक्रवारी रात्री तिघांवर आचोळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
आचोळे गावात राहणारे हेमंत चौधरी नाशिक येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलीला सोडण्यासाठी सहकुुटुंब गेले होते. परत येताना शुक्रवारी कसारा घाटानजीक उंबरमाळीजवळ कंटेनर आणि त्यांच्या कारमध्ये भीषण अपघात झाला. त्यात हेमंत चौधरी (४५) यांच्यासह त्यांच्या मोठ्या भावाचा मुलगा मनोज चौधरी (२२) आणि मित्र रमेश नाईक (५५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी मधुमती चौैधरी (३६), मुलगा धीरज चौधरी (२६) आणि मुलगी धनश्री चौधरी (२०) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर ठाणे येथील खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
रात्री उशिरा तिघांचेही मृतदेह नाशिकहून आचोळे येथील घरी आणल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपला मुलगा आणि नातू अपघातात मृत्युमुखी पडल्याचे समजताच आजारी असलेल्या काशिनाथ चौधरी यांचाही रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चौधरी कुुटुंबावर झालेल्या आघातामुळे आचोळे गाव शोकसागरात बुडाले आहे.

मुलगा, नातवाच्या निधनाने वडिलांनीही सोडले प्राण
मुलगा आणि नातू अपघातात मृत्युमुखी पडल्याचे समजताच घरी अंथरुणावर खिळलेल्या काशिनाथ चौधरी यांचाही रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Web Title: Death of three family members in accident in Kasra Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात