मतदारांनी राखले सर्वच पक्षांचे अस्तित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:56 PM2019-03-25T22:56:58+5:302019-03-25T22:57:13+5:30

३६ ग्रामपंचायतींमधील ३६ सरपंचपद व २२२ सदस्यपदाकरिता झालेल्या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत नव्यांना संधी दिली. सर्वच राजकीय पक्षांचे अस्तित्व कायम असल्याचे चित्र दिसते. निवडणुकीत ४२,२६४ मतदारांपैकी ३५,००४ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ८२.८२ इतकी होती.

The existence of all the parties of the voters | मतदारांनी राखले सर्वच पक्षांचे अस्तित्व

मतदारांनी राखले सर्वच पक्षांचे अस्तित्व

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : निवडणुकीत सर्वच पक्षांना संमिश्र यश

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : ३६ ग्रामपंचायतींमधील ३६ सरपंचपद व २२२ सदस्यपदाकरिता झालेल्या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत नव्यांना संधी दिली. सर्वच राजकीय पक्षांचे अस्तित्व कायम असल्याचे चित्र दिसते. निवडणुकीत ४२,२६४ मतदारांपैकी ३५,००४ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ८२.८२ इतकी होती.
तालुक्यातील मनगाव ग्रामपंचायतीत विजय श्यामराव वाणे २१८ मते घेत सरपंचपदी निवड झाली. वडगावमध्ये वर्षा उल्हास गणवीर ४१७ मते, वासी ग्रामपंचायतीत प्रवीण सूर्यभान पंचवटे ३३४ मते, कारडामध्ये सचिन अशोक नाईक १३६ मते, धोंडगावमध्ये गुणमाला विलास मोटघरे ६९१ मते, अंतरगाव सुभाष म्हैसकर ४०४ मते, फरीदपूरमध्ये आशा अनिल धाडसे २६२, सेवामध्ये सपना प्रमोद पंधराम २६१, सिल्लीमध्ये सुमित्रा कोवे ४११ मते, नांद्र्रामध्ये ललित शंकर सोयाम २०२ मते, निरगुडीमध्ये किशोर भालचंद्र कुडमते ४३६, निंभामध्ये जितेंद्र दांडेकर ३२५ मते, शेडगावमध्ये मुरली शालिग्राम चौधरी ५४५ मते, डोंगरगावमध्ये संजय दमडू वरघणे ३९८ मते, बोथुडामध्ये सारिका सचिन इंगोले ५६२, विखणीमध्ये प्रवीण त्र्यंबक साटोणे ३७६ मते, पारडीमध्ये शीतल सचिन बुचके ५५० मते, रामनगरमध्ये लता शंकर धोटे ४०४, आजदामध्ये विमल विठ्ठल मुंगल ३८६ मते, मांडगावमध्ये संध्या सुरेश डांगरी १८३१ मते, नंदोरीमध्ये संजीवनी मंगेश राऊत ७८३ मते, वायगाव (हळद्या)मध्ये उत्तम घुमडे ४८७ मते, लसणपूरमध्ये रत्ना शेषराव परमोरे ४७२ मते, धामणगावमध्ये विनोद, तासमध्ये वीणा चंद्रशेखर झोटिंग ३५७ मते, पिंपळगावमध्ये किसना डोमाजी शेंडे ३२३ मते, आरंभामध्ये ईश्वर नारायण सुपारे ५८९ मते, पाठरमध्ये वैशाली खुशाल धोटे ५०५, उंदिरगावमध्ये रमेश महादेव उईके ३६६ मते, बावापूरमध्ये महेश रामेश्वर बरडे २४४ मते, उमरामध्ये उमेश एकनाथ चौधरी २४५ मते, गोविंदपूरमध्ये शारदा दिवाकर तुमडाम ३५० मते, बरबडीमध्ये वैशाली राजू घोडे ३४३ मते, भोसामध्ये पिंकी अंड्रस्कर ४९२, किन्हाळामध्ये उत्तम नागोराव बावणे ४१७, कळमनामध्ये चेतना शंकर बोरकर २२९ मते घेत सरपंचपदी निवडून आले आहेत.
तहसीलदार राजू रणवीर, नायब तहसीलदार सूर्यवंशी, के.डी . किरसान , पंकज वाटमोडे, नरेश वानकर यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रिया पार पडली. ठाणेदार प्रवीण मुंडे, उपनिरीक्षक मिलिंद पराडकर, माधुरी गायकवाड यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: The existence of all the parties of the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.