चंद्रपूर-नागपूर बसला अपघात; तीन जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:15 PM2018-03-19T12:15:10+5:302018-03-19T12:17:02+5:30

चंद्रपूरहून नागपूरकडे निघालेली राज्य परिवहन महामंडळाची बस वर्धा जिल्ह्यातील नारायणपूरजवळ सोमवारी सकाळी अनियंत्रित होऊन पुलाखाली कोसळली.

Chandrapur-Nagpur bus accident; Three people are serious | चंद्रपूर-नागपूर बसला अपघात; तीन जण गंभीर

चंद्रपूर-नागपूर बसला अपघात; तीन जण गंभीर

googlenewsNext
ठळक मुद्देबस अनियंत्रित होऊन पुलाखाली कोसळली

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: चंद्रपूरहून नागपूरकडे निघालेली राज्य परिवहन महामंडळाची बस वर्धा जिल्ह्यातील नारायणपूरजवळ सोमवारी सकाळी अनियंत्रित होऊन पुलाखाली कोसळली. या बसमध्ये ५० प्रवासी होते त्यापैकी १६ जण जखमी झाले आहेत. यापैकी तिघेजण गंभीररित्या जखमी असून त्यांना हिंगणघाट येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बाकी जखमींवर नंदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले जात आहेत. बसचा चालक बेशुद्ध असल्याने हा अपघात कसा झाला ते स्पष्ट झालेले नाही. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.  

Web Title: Chandrapur-Nagpur bus accident; Three people are serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात