गोविंदा पथकांचा विमा महापालिकांनी उतरवावा; मनसेच्या अविनाश जाधवांची मागणी

By अजित मांडके | Published: August 3, 2022 05:53 PM2022-08-03T17:53:14+5:302022-08-03T17:54:18+5:30

ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे अविनाश जाधव यांनी दिलं मागणीचं पत्र

MNS Leader Avinash Jadhav says Thane TMC should provide insurance cover to Govinda at Dahi Handi 2022 | गोविंदा पथकांचा विमा महापालिकांनी उतरवावा; मनसेच्या अविनाश जाधवांची मागणी

गोविंदा पथकांचा विमा महापालिकांनी उतरवावा; मनसेच्या अविनाश जाधवांची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: वसई-विरार महापालिकेने त्यांच्या हद्दीतील गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरवला आहे. त्या धर्तीवर, ठाणे महापालिकनेही शहरातील गोविंदा पथकाचा अपघात विमा उतरवावा. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, मुंबई,नवी मुंबई महापालिकासोबत राज्यातील सर्व बड्या महापालिकानी पुढाकार घेऊन अशा प्रकारे गोविंदा प  थकांचा विमा उतरवावा असेही त्यांनी सांगितले.

कोरोना काळात दोन वर्ष गणेशोत्सव आणि दहीहंडी सारख्या सार्वजनिक सणांवर आलेल्या निर्बंधामुळे मराठी मनावर मरगळ आली होती. परंतु यावर्षी मात्र सर्व सण जोषात साजरा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने गणेश भक्त आणि गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने यंदा दहीहंडी उत्सवाकरीता वसई विरार महापालिकेने घेतलेल्या एका निर्णयाने गोविंदा सुखावले आहेत. वसई विरार महापालिकेने आपल्या मनपा क्षेत्रातील सर्व गोविंदांचा अपघाती विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात देखील अनेक गोविंदा पथके आहेत, याच धर्तीवर ठाणे महापालिकेने एक पाऊल पुढे टाकत गोविंदा पथकातील बाळगोपाळांचे विमा उतरवावेत, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

किंबहुना, वसई विरारच का, ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वच महापालिकानी गोविंदाचे विमे उतरविले पाहिजेत. अशी मागणी त्यांनी केली. या आधी जायबंदी झालेल्या गोविंदाच्या औषधोपचाराचा सर्व खर्च शासनाने करावा अशी मागणी देखील त्यांनी केली. दही हंडी हा सण आता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून त्याला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले असल्याने पालिका प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत या सणात खारीचा वाटा उचलावे असेही ते म्हणाले.

वसई विरार महापालिकेने गोपाळकाला अपघात विमा योजनेस १ ऑगस्ट रोजी मंजुरी दिली आहे. यासाठी मंडळांनी आपल्या नोंदणीकृत मंडळाच्या पत्रावर गोविंदाचा पूर्ण तपशील व आधार कार्डची छायाकित प्रत जोडावी. या योजनेत १२ वर्षाखालील गोविंदांचा विमा काढला जाणार नसुन नोंदणीसाठी १६ ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Web Title: MNS Leader Avinash Jadhav says Thane TMC should provide insurance cover to Govinda at Dahi Handi 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.