जलयुक्त शिवारचा सिंधुदुर्गातील ५८ गावांना फायदा, ३३३0.७३ टीसीएम पाणीसाठवण क्षमतेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:26 AM2017-12-21T11:26:14+5:302017-12-21T11:34:35+5:30

पाणी टंचाईवर मात, दुबार पिक व फळझाड लागवडीखाली क्षेत्रात भरघोस वाढ व्हावी हा उद्देश समोर ठेऊन राज्य शासनाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून राज्यात सुरू केलेले जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षांत या योजनेंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५८ गावांना फायदा झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील दुबार पीक व फळझाड लागवडीखालील क्षेत्रही वाढण्यास मदत झाली आहे.

Water tanker benefited from 58 villages in Sindhudurg, 3330.73 TCM water supply capacity | जलयुक्त शिवारचा सिंधुदुर्गातील ५८ गावांना फायदा, ३३३0.७३ टीसीएम पाणीसाठवण क्षमतेची निर्मिती

जलयुक्त शिवारचा सिंधुदुर्गातील ५८ गावांना फायदा, ३३३0.७३ टीसीएम पाणीसाठवण क्षमतेची निर्मिती

Next
ठळक मुद्दे ३३३0.७३ टीसीएम पाणीसाठवण क्षमतेची निर्मिती फळझाड लागवडीखालील क्षेत्रही वाढण्यास मदत होणार

सिंधुदुर्गनगरी : पाणी टंचाईवर मात, दुबार पिक व फळझाड लागवडीखाली क्षेत्रात भरघोस वाढ व्हावी हा उद्देश समोर ठेऊन राज्य शासनाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून राज्यात सुरू केलेले जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.

सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षांत या योजनेंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५८ गावांना फायदा झाला असून या गावांमध्ये एकूण ३३३०.७३ टीसीएम एवढ्या पाणी साठवण क्षमतेची निर्मिती झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील दुबार पीक व फळझाड लागवडीखालील क्षेत्रही वाढण्यास मदत झाली आहे.

सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र - २०१९ अंतर्गत २०१५-१६ पासून महाराष्ट्र शासन ह्यजलयुक्त शिवार अभियानह्ण ही महत्त्वाकांशी योजना राबवित आहे. ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाणलोट प्रकल्प पूर्ण झालेल्या तसेच पाणीटंचाई जाणवणाºया गावांची निवड या अभियानात करून ती गावे पाणी टंचाईमुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यासाठी गावातील नागरिकांच्या सहकार्याने करावयाच्या उपाययोजनांचे आराखडे बनविले जातात. तर गावात शिवार फेरी काढून याबाबत जनजागृती केली जाते. ही योजना पाच वर्षांसाठी आहे. या पाच वर्षात जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पाणी टंचाईमुक्त करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा आहे.


२०१५-१६ या पहिल्या वर्षी ३५ गावांची निवड प्रकल्पाअंतर्गत करण्यात आली होती. या गावांत पाणी साठा सुरक्षित करणारी ४९४ कामे करण्यात आली होती. १७ कोटी ३९ लाख २८ हजार रुपये एवढा निधी यासाठी खर्च करण्यात आला. ही सर्व कामे पूर्ण झाली असून यामुळे २६०७.३० टीसीएम एवढी पाणी साठवण क्षमतेची निर्मिती होऊ शकली आहे. ९३५.८१ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले. परिणामी दुबार पिकाखाली व फळझाड लागवडीखाली क्षेत्र या गावातील वाढले आहे.


२०१६-१७ मध्ये २३ गावांची जलयुक्तमध्ये निवड करण्यात आली. २७२ कामांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी १५ कोटी ११ लाख ९४ हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यातील २६९ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. २३८ कामे सुरु झाली असून २०६ कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत या कामांवर पाच कोटी ९१ लाख ७३ हजार रुपये एवढा खर्च झाला आहे.

या पूर्ण झालेल्या कामामुळे ७२३.४३ टीसीएम एवढी पाण्याची साठवण क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. ११३४.७३ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येऊ शकले. परिणामी दुबार पिकाखालील क्षेत्र ६४० हेक्टरने वाढू शकले. तर फळबाग लागवडीखालील क्षेत्रातही ५०० हेक्टरने वाढ झाली आहे.


जलयुक्त शिवार योजनेची सर्व कामे पूर्ण झाल्यावर या जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात होणाºया संभाव्य पाणीटंचाईवर काही अंशी मात करणे प्रशासनाला सोपे जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात ३५ गावे

जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यात हडपीड, वाघिवरे, शिरवली, कोटकामते, कुवळे, नाधवडे, हरकुळ खुर्द, करंजे, कोळोशी, ओझरम, नागसावंतवाडी, कुणकवळे, चुनवरे, चिंदर, कर्लाचा व्हाळ, तुळसुली तर्फ माणगाव, हिर्लोक, आंदुर्ले, शिवापूर, भडगाव, गोठोस, आवळेगाव, कोचरा, आरवली, सोनुर्ली, केसरी, भालावल बावळाट, निरवडे, तांबोळी, तळकट, फुकेरी, पालये, कुंभवडे, कोंडये.

दुसऱ्या टप्प्यात २३ गावांचा समावेश

जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात वळीवंडे, शेवरे, उंबर्डे, तिरवडे तर्फ खारेपाटण, वारगाव, कसवण-तळवडे, धारेश्वर-कासार्डे, वायंगणी, वराड, पोईप, मसुरे, किनळोस, बांबुळी, केरवडे कर्याद नारूर, साळगाव, रावदस-कुसेवाडा, पेंडुर, मळगाव, गेळे, नेमळे, माजगाव, माटणे, वझरे या जिल्ह्यातील २३ गावांमध्ये सन ३0१६-१७ या आर्थिक वर्षात कामे करण्यात आली आहेत.

मानस पूर्णत्वास जाईल

२०१७-१८ या वर्षासाठी ३७ गावांची निवड करण्यात आलेली आहे. पाणलोटची ८०० कामे प्रस्तावित करून १४ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

या आराखड्यानुसार कामे पूर्ण झाल्यास संरक्षित, फळबाग लागवड, दुबार पिकाखालील क्षेत्रात वाढ होणार असून जिल्ह्याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार आहे. एकंदरीत जलयुक्त शिवार अभियानचा पाणी टंचाईमुक्त गावे हा मानस पूर्णत्वाकडे जाताना या जिल्ह्यात दिसत आहे.

Web Title: Water tanker benefited from 58 villages in Sindhudurg, 3330.73 TCM water supply capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.