राष्ट्रीय सेवा योजना : महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी बांधले १० बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 05:11 AM2018-01-12T05:11:57+5:302018-01-12T05:12:05+5:30

युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेताना होत असते, तर हे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरु णांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे काम महाविद्यालयीन स्तरावर ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एनएसएस) युवा चळवळीतून होत असते.

National Service Scheme: 10 bunds built by college students | राष्ट्रीय सेवा योजना : महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी बांधले १० बंधारे

राष्ट्रीय सेवा योजना : महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी बांधले १० बंधारे

Next

- जयंत धुळप

अलिबाग : युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेताना होत असते, तर हे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरु णांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे काम महाविद्यालयीन स्तरावर ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एनएसएस) युवा चळवळीतून होत असते. त्याद्वारे युवाशक्ती मोठे कार्य उभे करत असते, हे रायगड जिल्ह्यातील दहा महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ६११ युवती आणि ४०० युवक अशा एकूण १ हजार ११ स्वयंसेवकांनी अथक कष्ट करून तब्बल दहा वनराई बंधारे बांधून सिद्ध करून दाखविले आहे. यामध्ये युवती आघाडीवर होत्या, हे विशेष उल्लेखनीय मानले जात आहे. परिणामी, यंदाच्या राष्ट्रीय युवक दिनी या सर्व युवक -युवतींच्या मनात जलसंवर्धनाच्या राष्ट्रीय प्रयत्नात आम्हीही कमी नाही, अशी समाधानाची आणि गर्वाची भावना आहे.
शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्र मापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढत आहे. त्यास युवा पिढीचा सकारात्म प्रतिसाद लाभत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत असल्याची भावना राष्ट्रीय सेवा योजनेचे रायगड जिल्हा समन्वयक डॉ. एम. एन. वाणी यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील पाणीसमस्येवर उपाययोजना करण्याकरिता आपणही आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे, अशा हेतूने जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाºयांच्या बैठकीत वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई विद्यापीठानेही वनराई बंधारे उपक्रमास प्राधान्य दिले आहे. अलिबागच्या जेएसएम कॉलेजची ५० मुले आणि ४४ मुली, अशा एकूण ४९ एनएसएस स्वयंसेवकांनी अलिबाग जवळच्या मानिभुते येथे, उरण येथील केडी उरण कॉलेजच्या २३ मुले आणि २६ मुली, अशा एकूण ४९ एनएसएस स्वयंसेवकांनी उरण तालुक्यातील पिरकोन येथे, सीकेटी कॉलेज(नवीन पनवेल)ची २५ मुले आणि ९३ मुली, अशा एकूण ११८ एनएसएस स्वयंसेवकांनी पनवेल तालुक्यातील नेरे येथील आदिवासी आश्रमशाळे जवळच्या नदीत, पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या ३२ मुले आणि ५२ मुली, अशा एकूण ८४ एनएसएस स्वयंसेवकांनी पेण तालुक्यातील वाक्रुळ येथे, मुरुडच्या वसंतराव नाईक कॉलेजच्या ३६ मुले आणि ६६ मुली, अशा एकूण १०२ एनएसएस स्वयंसेवकांनी मुरुड जवळच्या तेलवडे गावात, पाली-सुधागड येथील जे.एन.पालीवाला कॉलेजची ४६ मुले आणि १०५ मुली, अशा एकूण १५१ एनएसएस स्वयंसेवकांनी सिद्धेश्वर गावी, रोहा येथील को.ए.सो. देशमुख-ताम्हाणे कॉलेजची ५४ मुले आणि ९९ मुली, अशा एकूण १५३ एनएसएस स्वयंसेवकांनी भागिरती खार येथे, तळा येथील दत्ताजीराव तटकरे कॉलेजची ५५ मुले आणि ५१ मुली, अशा एकूण १०६ एनएसएस स्वयंसेवकांनी खैराट गावी, तळा येथीलच वेदक कॉलेजची ४६ मुले आणि ३१ मुली, अशा एकूण ७७ एनएसएस स्वयंसेवकांनी भागकोंड येथे तर किहिम-चोंढी येथील एलएसपीएम कॉलेजची ३३ मुले आणि ४४ मुली, अशा एकूण ७७ एनएसएस स्वयंसेवकांनी आवास येथे वनराई बंधारे बांधले आहेत.

दहा लाख गॅलन पाणी अडविले
या सर्व दहा वनराई बंधा-यांच्या माध्यमातून सुमारे दहा लाख गॅलन पाणी अडविण्यात यश आले आहे. अडवलेले पाणी जमिनीत मुरून बंधाºयांच्या परिसरातील भूजलपातळीत येत्या काळात वाढ होणे अपेक्षित आहे, तर विहिरींच्या पातळीत यंदा लवकर घट होणार नाही, असा अंदाज स्थानिक जाणकार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

महाविद्यालयीन विश्वातील विधायक युवा चळवळ
डॉ. डी. एस. कोठारी शिक्षण आयोगाने शिक्षणाच्या सर्वच टप्प्यांवर विद्यार्थी समाजसेवेशी जोडला जावा, अशी शिफारस १९६४-६६च्या दरम्यान केली होती. १९६७मध्ये राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेत एनसीसी सोबत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) असावी, हे मान्य झाले. त्यानंतर झालेल्या कुलगुरूंच्या परिषदेत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वागत होऊन २४ सप्टेंबर १९६९ रोजी महात्मा गांधीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने तेव्हाचे शिक्षणमंत्री व्ही. के. आर.व्ही. राव यांनी देशातील ३७ विद्यापीठांत प्रायोगिक तत्त्वावर राष्ट्रीय सेवा योजना सुरू केली. आज देशातील सर्व विद्यापीठांतील सर्व महाविद्यालये व लक्षावधी विद्यार्थी या योजनेत सहभागी झाले असून, राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन विश्वातील मोठी विधायक युवा चळवळ बनली आहे.

Web Title: National Service Scheme: 10 bunds built by college students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड