भेगाळली भुई उसवले मन...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 02:57 PM2019-05-08T14:57:27+5:302019-05-08T15:07:22+5:30

मुंबई : विदर्भासह राज्याच्या विविध भागामधून दुष्काळग्रस्त नागरिक रोजगारासाठी नवी मुंबईत दाखल झाले आहेत. गावाकडे पिण्यासाठी पाणी नाही. तसेच, हाताला रोजगार नसल्याने शेकडो कुटुंबीयांनी स्थलांतर केले आहे. शहरात मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेऊन आणि मिळेल ते काम करुन हे नागरिक कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून त्यांच्या कष्टप्रद जीवनाचा 'लोकमत'चे छायाचित्रकार संदेश रेणोसे यांनी घेतलेला सचित्र आढावा...