नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करा
By admin | Published: July 13, 2014 11:07 PM2014-07-13T23:07:36+5:302014-07-14T00:30:47+5:30
नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करा
नाशिक : पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरीवर्गावर संकट कोसळले असून, शासनाने तातडीने नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, अशा मागणीचा ठराव नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला.
राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक होऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याचवेळी पुणे विद्यापीठाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याच्या निर्णयाचे तसेच मराठा समाज व मुस्लीम समाजास देण्यात येणाऱ्या आरक्षणाचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार पंकज भुजबळ, आमदार जयंत जाधव, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार उत्तम भालेराव, संजय पवार, दिलीप बनकर, नरहरी झिरवाळ, संजय चव्हाण, जगन्नाथ धात्रक, श्रीराम शेटे, सुनील बागुल, नाना महाले, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, शोभा मगर आदि उपस्थित होते.