किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:43 PM2019-07-20T12:43:59+5:302019-07-20T12:44:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किरकोळ कारणावरून दोघांवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना नंदुरबारातील उत्तमभाई चाळ परिसरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : किरकोळ कारणावरून दोघांवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना नंदुरबारातील उत्तमभाई चाळ परिसरात घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रय} केल्याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणारे विक्की मंगल जव्हेरी व उत्तम भाई चाळ परिसरात राहणारे कुणाल सुनील वाघ यांच्यात मागील भानगडीचा वाद होता. त्यातून 18 जुलै रोजी रात्री त्यांच्यात वाद उद्भवला. मुकेश सुभाष जव्हेरी व विक्की मंगल जव्हेरी यांना घेरून कुणाल सुनील वाघ, सागर सुनील वाघ, गौरव अशोक वाघ, यश अशोक वाघ, सुनील रामभाऊ वाघ व अशोक रामभाऊ वाघ यांनी मारहाण केली. कुणाल वाघ याने त्याच्याकडील चाकूने दोघांवर वार करून जबर जखमी केले.
जखमी अवस्थेत विक्की वाघ व मुकेश वाघ यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत विक्की जव्हेरी यांनी फिर्याद दिल्याने सहा जणांविरुद्ध ठार मारण्याचा प्रय} केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक भापकर करीत आहे. पाच जणांना अटक केली आहे.