विकासाला विवेकाची जोड हवी - प्रल्हाद पै

By admin | Published: April 11, 2017 08:20 PM2017-04-11T20:20:28+5:302017-04-11T22:59:08+5:30

माझे वडिल वामनराव पै यांनी मागच्या 60 वर्षांपासून जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचे कार्य केले.

Development needs a combination of Vivek - Pralhad Pai | विकासाला विवेकाची जोड हवी - प्रल्हाद पै

विकासाला विवेकाची जोड हवी - प्रल्हाद पै

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 11 - समाजभूषण पुरस्कार हा  माझा गौरव नसून माझ्या वडिलांचाही सन्मान आहे. माझे वडिल वामनराव पै यांनी मागच्या 60 वर्षांपासून जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचे कार्य केले. हा माझा एकटयाचा सन्मान नसून, जीवन विद्या मिशनच्या कार्यकर्त्यांच्यावतीने मी हा पुरस्कार स्वीकारतो असे प्रल्हाद पै यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले. 
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
 
हा सोहळा थेट पाहा फेसबुकवर...
facebook.com/lokmat
 
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार सोहळयात जीवन विद्या मिशनच्या प्रल्हाद पै यांना समाजभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय राजनाथ सिंह मंचावर उपस्थित होते. 
 
शिक्षणाला सुसंस्कारांची जोड हवी आणि विकासाला विवेकाची. विकासाला विवेकाची जोड लाभली तर विकास झकास होतो नाही तर भकास होतो. लोकमत समूहाने हा जो गौरव केला त्याबद्दल मी जीवनविद्या मिशनतर्फे मी आभार मानतो असे प्रल्हाद पै यांनी सांगितले. 
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
 
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४  कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा
http://lmoty.lokmat.com/vote.php
 

Web Title: Development needs a combination of Vivek - Pralhad Pai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.