वाहतुकीच्या कोंडीचा एएसपींनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:10 AM2019-03-14T11:10:58+5:302019-03-14T11:11:07+5:30

जळगावच्या सुरत रेल्वेगेटवरील प्रकार

ASP in traffic congestion also hit | वाहतुकीच्या कोंडीचा एएसपींनाही फटका

वाहतुकीच्या कोंडीचा एएसपींनाही फटका

Next
ठळक मुद्देतब्बल साडे तीन तास नागरिक झाले हैराण


जळगाव : शहरातील सुरत रेल्वेगेटजवळ बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास साईडपट्टी खचल्याने त्यात ट्रक रुतून तब्बल साडे तीन तास वाहतूक कोंडी झाली. यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. यात सर्वात मोठा फटका बसला तो सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांना. ते स्वत: या वाहतुक कोंडीत दीड तास अडकले.
दरम्यान, वाहतूक विभागाचे १५ ते १६ कर्मचारी, आरपीएफचे कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुनही ते निष्फळ ठरले. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे सर्व वाहतूक ही दुध फेडरेशनकडील सुरत रेल्वेगेटकडून होत आहे. त्यातच सुरत रेल्वेगेट हे दिवसभरात येणाऱ्या-जाणाºया रेल्वेमुळे १९ ते २० वेळा बंद होते. यामुळे या गेटजवळ वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे.
विद्यार्थ्यांना घरी जाण्यास विलंब
दहावी व बारावीच्या परीक्षा सुरु असल्यामुळे दुपारी परीक्षा देवून घरी जाणाºया विद्यार्थ्यांचे या वाहतूक कोंडीमुळे प्रचंड हाल झाले. दुपारी २ वाजेनंतर परीक्षा संपल्यानंतर ममुराबाद, आव्हाणे, कानळदा, विदगाव, भोकर या भागातील विद्यार्थी रात्री ८ वाजेपर्यंत घरी पोहचले. आपले पाल्य सायंकाळी ६ वाजेपर्यंत घरी न आल्याने पालक देखील चिंतेत होते. यामुळे अनेकांकडून आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना, बसस्थानकात फोन करत पाल्यांबाबतची माहिती घेतली. तर वाहतूककोंडीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनीही इतर नागरिकांच्या मोबाईलवरून पालकांना उशीरा येण्याचे कारण देत असल्याचे दिसून आले.
वाहनधारकांमध्ये वाद
कोंडी इतकी भयंकर होती की, वाहनधारकांना आपले वाहने पुढे देखील सरकवता येत नव्हते. वाहनांचा धक्का लागल्यामुळे अनेक वाहनधारकांमध्ये चांगलाच वाद देखील झाले. काही वाहनधारकांची वाहनांवरुनच बाचाबाची झालेली पहायला मिळाली. तसेच पायी जाणाºया नागरिकांना देखील जागा शिल्लक नसल्याने अनेक नागरिक रेल्वे लाईनवरुन धोकेदायक पध्दतीने मार्ग काढत होते.
आरपीएफचे जवानही वैतागले
वाहनांची संख्या वाढत जात असल्याने वाहतूक विभागाकडून या ठिकाणी अतिरीक्त कर्मचारी बोलविण्यात आले. तसेच रेल्वे पोलीसांनी देखील कर्मचारी बोलावून घेतले. त्यांनी देखील जिकरीचे प्रयत्न करुनही वाहतूक सुरळीत होत नसल्याने वाहतूक कर्मचारीही वैतागलेले होते.
नीलाभ रोहन यांच्या सुरक्षा रक्षकाची कसरत... सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन हे अवैध धंद्यावर कारवाईसाठी जात असताना ते देखील वाहतूक कोंडीत साडेतीन तास अडकले होते. त्यांच्यासोबत आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीही वाहतूककोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही उपयोग झाला नाही. सायंकाळी ६.३० वाजता वाहतूक सुरळीत झाल्यानंतरच रोहोन यांचीही सुटका झाली.
दहा ते बारा बसेसही अडकल्या... मालवाहतूक ट्रक, वाळूच्या ट्रॅक्टरमुळे या वाहतूककोंडीत अधिक भर टाकलेली पहायला मिळाली. रेल्वेगेटच्या दोन्हीही बाजूस दहा ते बारा बसेस अडकल्या होत्या. यामुळे बसेसचे संपूर्ण वेळापत्रक देखील कोलमडले होते. मालधक्क्याकडून येणारी सर्व वाहने देखील या ठिकाणी अडकले होते.
चारही रस्त्यांवर लागल्या वाहनांच्या रांगा
बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मालगाडी कॉस झाल्यानंतर या गेटजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. गेटजवळ येणाºया एसके आॅईलमील कडील रस्ता, जुना हायवे, एसएमआयटी कॉलेज व रेल्वे मालधक्का या चारही रस्त्यांकडून एकाच वेळी वाहने आल्यामुळे ही वाहनांच्या रांगा लागल्या. त्यातच रेल्वेगेट पुन्हा-पुन्हा बंद होत असल्याने वाहनांची संख्या ही वाढतच गेली. यामुळे सुरत रेल्वेगेटपासून एसके आॅईल मील, निमखेडी नाका व एसएमआयटी कॉलेजपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहने जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने वाहनधारकांना या ठिकाणी उभ राहण्याशिवाय दुसरा पर्याय दिसून आला नाही.

Web Title: ASP in traffic congestion also hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.