दलितवस्तीत उजळला प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:33 AM2018-04-26T00:33:28+5:302018-04-26T00:33:28+5:30

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिन १४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सौभाग्य योजनेतून महावितरणच्या वतीने दलितवस्तीत शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.

Light blue light | दलितवस्तीत उजळला प्रकाश

दलितवस्तीत उजळला प्रकाश

Next
ठळक मुद्देग्रामस्वराज्य अभियान : महावितरणने फुलविले १३२४ चेहऱ्यांवर हास्य

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिन १४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सौभाग्य योजनेतून महावितरणच्या वतीने दलितवस्तीत शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत एकूूण १३२४ चेहºयांवर हास्य फुलविण्यात महावितरणचे चंद्रपूर परिमंडळ यशस्वी ठरले आहे.
या अभियानांतर्गत चंद्रपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील येल्लापूर येथे १३८, गुडसेल्ला येथे ११० व कुंभेझरी येथे १६६, चिमूर तालुक्यातील वडसी येथे ५२, ब्रम्हपुरी तालुक्यातील कहाली येथे १७, चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथे ३४ व गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे ७ घरात वीज जोडणी करण्यात आली आहे. यासोबतच गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक येथे ७०, अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे १११, महागाव येथे ८३, चेरपल्ली येथे ६२, गोंिवंदगाव येथे ६०, सिरोंचा तालुक्यातील नाडीगुडा येथे १७१, जाफराबाद येथे १३९ व गुमलकोंडा येथे १०४ गावात वीज जोडण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ८०० व चंद्रपूर जिल्ह्यातील ५२४ अशा एकूण १३२४ गरीब घरात प्रकाशाची किरणे पोहोचल्यामुळे त्यांच्या चेहºयावर हास्य फुलले आहे.
राज्यभरातील १०२ गावात हे अभियान राबविण्यात येत असून यात विदर्भातील सर्वाधिक १४० गावांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील ज्या गावात ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा १९२ गावात शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यात विदर्भातील १४० गावांचा समावेश आहे. त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबिर लावण्यात आले आहे. या शिबिरात लाभार्थ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येत आहे. उज्ज्वला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते वीजजोडणी व एलईडी बल्ब प्रदान करण्यात आले.
उद्दिष्ट करणार पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, चंद्रपूर मंडळाचे अधिक्षक अभियंता हरीश गजबे व गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक म्हसके यांच्या मार्गदर्शनात संबंधित विभाग व उपविभाग वीज जोडणी देण्याचे दायित्व पार पाडत आहे. दरम्यान, शासनाने दिलेले उद्दिष्ट महावितरणच्या वतीने पूर्ण केले जाईल, अशी माहिती येथील महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिली.

Web Title: Light blue light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज