एकवीस वर्षांनंतर सुरू होणार औरंगाबाद - उदयपूर विमानसेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 05:55 AM2019-06-13T05:55:10+5:302019-06-13T05:55:47+5:30

औरंगाबाद दोन दशकांपूर्वी राजस्थानशी विमानसेवेने जोडलेले होते.

Aurangabad-Udaipur flight will start after 21 years | एकवीस वर्षांनंतर सुरू होणार औरंगाबाद - उदयपूर विमानसेवा

एकवीस वर्षांनंतर सुरू होणार औरंगाबाद - उदयपूर विमानसेवा

googlenewsNext

औरंगाबाद : शहराहून तब्बल एकवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा उदयपूरसाठी विमानसेवा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. औरंगाबादहून दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळाची बुधवारी एअर इंडियाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अश्विनी लोहानी आणि कार्यकारी संचालक मीनाक्षी मलिक यांच्यासोबत बैठक झाली. दिवाळीपूर्वी औरंगाबाद-मुंबई-उदयपूर सेवा सुरू होणार असल्याचे एअर इंडियातर्फे सांगण्यात आले.

औरंगाबाद दोन दशकांपूर्वी राजस्थानशी विमानसेवेने जोडलेले होते. शहरात जयपूर-उदयपूरहून येणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या होती. औरंगाबादला आल्यानंतर जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणीला पर्यटक भेट देत. त्यातून पर्यटन व्यवसायदेखील वाढत असे; परंतु ही विमानसेवा बंद झाली आणि पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला. वीस वर्षांपासून ही विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून औरंगाबादेतील सर्वांनी एकत्रित मागणी केल्याने एअर इंडियाकडून ही विमानसेवा दिवाळीपूर्वी सुरू करण्यासाठी आश्वासन मिळाले. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेल्या शिष्टमंडळात हॉटेल उद्योजक सुनीत कोठारी, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष राम भोगले, सचिव नितीन गुप्ता, इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटरचे अध्यक्ष प्रणब सरकार आणि इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटरचे उपाध्यक्ष राजीव मेहरा यांचा समावेश आहे.
 

Web Title: Aurangabad-Udaipur flight will start after 21 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.