दिड महिन्यात पंधरा टक्के जलसाठा घटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 02:11 PM2018-12-05T14:11:22+5:302018-12-05T14:13:43+5:30

अकोला: वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात धरणातील जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दिड महिन्यात यातील १५ टक्के जलसाठा घटला असून, आजमितीस केवळ ४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे

storage in the Dam decrease by 15 percent in last month | दिड महिन्यात पंधरा टक्के जलसाठा घटला!

दिड महिन्यात पंधरा टक्के जलसाठा घटला!

Next
ठळक मुद्दे बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ७६.४९ टक्के, एकबुर्जी ७२.१० तर सोनल धरणात ९३.७९ टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात आता केवळ ३६.२३ टक्केच जलसाठा आहे.

अकोला: वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात धरणातील जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दिड महिन्यात यातील १५ टक्के जलसाठा घटला असून, आजमितीस केवळ ४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पुढे आणखी सात महिने काढायचे असल्याने टंचाईचा प्रश्न उभा ठाकणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात तर आजच नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २५ सप्टेंबर रोजी ६३.४८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता. हा जलसाठा आॅक्टोबरमध्ये स्थिर होता. नोव्हेंबर महिना लागताच यामध्ये घट सुरू झाली असून, ३ डिसेंबर रोजी या सर्व धरणामध्ये एकूण ४८.९४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. बुलडाणा जिल्ह्यातीलच कोराडी मध्यम धरणातील जलसाठा केवळ २.६५ टक्के आहे. तोरणा ११.६६, तर उतावळी धरणातील पातळी ३७.७० टक्के असून, नळगंगा या मोठ्या धरणात १४.६७ टक्के, पेनटाकळी धरणात १०.६२ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १७.९५ टक्के, पलढगमध्ये २७.८३ टक्के, मन धरणात २२.२७ टक्के, तर मसमध्ये शून्य टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ७६.४९ टक्के, एकबुर्जी ७२.१० तर सोनल धरणात ९३.७९ टक्के जलसाठा आहे.
अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात आता केवळ ३६.२३ टक्केच जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९१.९२, अरुणावती ६५.३९ तर बेंबळा धरणात ३९.९२ टक्केच जलसाठा आहे.अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ७३.९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ९३.३१ टक्के जलसाठा असून, उमा ९०.७५, मोर्णा धरणात ४८.८२ टक्के, तर वान धरणात ८८.६५ टक्के जलसाठा आहे.

काही धरणात अल्प जलसाठा असल्याने प्रत्येकाने पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा. ज्या धरणांत भरपूर जलसाठा आहे, तेथे काही प्रमाणात सिंचनासाठी पाणी देण्यात येत आहे. यात अकोला जिल्ह्यातील तीन धरणांचा समावेश आहे.
अंकुर देसाई,
अधीक्षक अभियंता,
पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

Web Title: storage in the Dam decrease by 15 percent in last month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.