शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

जिल्हा परिषदेच्या विंधन विहिरी झाल्याच नाही

By admin | Updated: June 9, 2014 00:09 IST

जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचा काभार पूर्णत: ढेपाळला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष या समितीचे पदसिध्द सभापती असूनही मंजूर २७ विंधन विहिरी उन्हाळ्य़ात पूर्ण करता आल्या नाही. मृक्ष नक्षत्र लागल्यानंतर

यवतमाळ : जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचा काभार पूर्णत: ढेपाळला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष या समितीचे पदसिध्द सभापती असूनही मंजूर २७ विंधन विहिरी उन्हाळ्य़ात पूर्ण करता आल्या नाही. मृक्ष नक्षत्र लागल्यानंतर आता कुठे पंचायत समित्यांना विंधन विहिरी खोदण्याचे आदेश दिले आहे. केवळ टोलवा टोलवीचा प्रकार सुरू आहे. जिल्ह्यातील १६ पंचायत समित्यांमध्ये टंचाईग्रस्त गावात तातडीची उपाय योजना म्हणून ४७ विधंन विहिरी प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. भू-जल सर्व्हेक्षण विभागाने याची पाहणी करून यापैकी २७ ठिकाणीच विहीर तयार करण्याची परवानगी दिली. यासाठी तब्बल २७ लाख ७0 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषद यांत्रिक विभागाने मारेगाव तालुक्यातील कानड, चोपण आणि वणी तालुक्यातील रागंणा येथे विंधन विहीर तयार केली आहे. मात्र अजूनही २४ विंधन विहीर झाल्याच नाही. २४ एप्रिल रोजी आर्णी तालुक्यात किन्ही धनसिंग, किन्हीगाव, केळापूरमध्ये मारेगाव पुनर्वसन, बहात्तर, दारव्हा तालुक्यातील पहापळ, बरबडी, घाटंजीतील टिपेश्‍वर पुनर्वसन, शिवणी कोलाम पोड, शिरोली पारधी बेडा, कोची बेलघर, उमरखेड तालुक्यात बारा, राळेगावमध्ये खैरगावपोड, वरध येथे विंधन विहिरी तयार करण्याचे आदेश पंचायत समित्यांना दिले. त्यानंतर  ८ मे रोजी पुसद तालुक्यातील शेलु खुर्द, मोख, शिवणी, चिंचघाट, वणीतील ढाकोरी बोरी, कळंबमध्ये मंगरूळ येथे विंधन विहिरी तयार करण्याचे आदेश दिले. त्यापाठोपाठ ९ मे रोजी  यवतमाळ पंचायत समितीत बारडतांडा, बाभूळगाव येथे दिघी क्रमांक दोन, मारेगाव येथे घोगुलदरा, बिहाडी पोड, कोतुरला, नवरगाव, अर्जुनी गावपोड येथील विंधन विहिरी तयार करण्याचे आदेश दिले. हे आदेश देताना पैशाचे आवंटन पंचायत समित्यांना देण्यात आले नाही. त्यामुळे पंचायत समितीस्तरावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. बोअरवेल खोदणार्‍यांनी पंचायत समितीकडे आवंटन किती आहे, तरच कामाचा करार करा, अशी भूमिका घेतली. पैसाच नसल्याने कोणीच करार केला नाही. केवळ उदासीन प्रवृत्तीमुळे संपूर्ण उन्हाळ्य़ात केवळ तीन विंधन विहिरी खोदण्यात आल्या आहेत. यावरून जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाच्याबाबतीत किती सजग आहे हे दिसून येते. उन्हाळ्य़ात पाणी नसल्याने पायपीट करणार्‍या ग्रामस्थांच्या हाल अपेष्टांची जाणीव यंत्रणेतील एका अधिकारी कर्मचार्‍याला नसल्याचे दिसून येते. पैसा असुन वेळेत काम करता आले नाही. आता पावसाळा तोंडावर आल्यानंतरही काम होते की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. या उन्हाळ्य़ात मंजुर झालेले काम पुढच्या उन्हाळ्य़ापूर्वी तरी पूर्ण व्हावे, एवढीच माफक अपेक्षा ग्रामस्थांना आहे. खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अधिपत्याखाली येत असलेल्या विभागाची ही स्थिती आहे. यावरून इतर विभागात काय चालले आहे, याची कल्पना येते. लोककल्याणकारी योजना फाईलांमध्ये दडपण्यात तरबेज असलेल्या यंत्रणेला प्रत्यक्ष कामाला लावण्यात येथे अध्यक्ष प्रवीण देशमुखही अपयशी झाले असे, म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे या मुद्दावर अध्यक्षांनी अनेकदा पाणीपुरवठा समितीची बैठक घेतली आहे. त्यानंतरही प्रत्यक्ष कार्यवाही मात्र शून्यच असल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)