शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

गटारांच्या बजबजपुरीने यवतमाळकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:30 IST

एकेकाळी स्वच्छता अभियानामुळे नावारूपास आलेले यवतमाळ शहर आता अस्वच्छतेच्या नावाने ओळखले जावे इतकी दुर्गंधी आणि अस्वच्छता शहरात पसरली आहे. घंटागाड्या, अद्ययावत वाहने असतानाही नाल्या तुंबलेल्या आहेत. शहराचा आवाका वाढताच स्वच्छतेकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केले आहे. स्वच्छता, दिवाबत्ती आणि नाले आणि गटार स्वच्छता या विषयाकडे नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही.

ठळक मुद्देपालिकेला सफाईचा विसर : झोपड्यांत पावसाचे पाणी शिरणार

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एकेकाळी स्वच्छता अभियानामुळे नावारूपास आलेले यवतमाळ शहर आता अस्वच्छतेच्या नावाने ओळखले जावे इतकी दुर्गंधी आणि अस्वच्छता शहरात पसरली आहे. घंटागाड्या, अद्ययावत वाहने असतानाही नाल्या तुंबलेल्या आहेत. शहराचा आवाका वाढताच स्वच्छतेकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केले आहे. स्वच्छता, दिवाबत्ती आणि नाले आणि गटार स्वच्छता या विषयाकडे नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही.यामुळे आजही शहरात जागोजागी नाल्या तुंबलेल्या पहायला मिळतात. शहरातील सखल भागात पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका वाढला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. असे असले तरी मुख्याधिकारम आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाही. यामुळे नगराध्यक्षांनीही आता मुख्याधिकाºयांना पत्र लिहून नाला सफाईच्या कामाबाबत जाब विचारला आहे.सन २०१६ मध्ये नगरपरिषदेच्या लगतच्या आठ ग्रामपंचायती नगरपरिषदेत विलीन करण्यात आल्या. यामध्ये लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, वडगाव, मोहा, भोसा, डोर्ली आणि उमरसरा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायती नगरपरिषदेच्या क्षेत्रात विलीन झाल्याने या भागाचा विकास झपाट्याने होईल असा विश्वास या भागातील नागरिकांना होता. प्रत्यक्षात चार वर्ष लोटले तरी या भागातील प्रश्न मात्र कायम आहे. विशेष म्हणजे शहराच्या स्वच्छतेसंदर्भात दुर्लक्ष झाले आहे. यात नाल्यांची सफाई अग्रक्रमावर आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नगरपरिषद क्षेत्रातील नाल्यांची सफाई होणे अपेक्षित होते. मात्र सफाईच्या संदर्भात निविदाच उशिरा उघडण्यात आल्या. आता जून महिना संपत आला तरी स्वच्छतेचे काम कासवगतीने सुरू आहे.शहरातील मुख्य नाल्याच्या स्वच्छतेबाबत प्रचंड ढिसाळ धोरण नगरपरिषदेने अवलंबिले आहे. यामुळे हा नाला विविध भागात तुंबला आहे. यामध्ये थर्माकोल, प्लास्टिकच्या बॉटल्स, प्लास्टिक कप, पिशव्या आणि इतरही साहित्य वाहून आले आहे. नाल्याच्या तोंडावर हा कचरा साचून बसला आहे. यानंतरही तो कचरा बाजूला केला गेला नाही.शहरातील बसस्थानक चौकातून थेट तलावफैलापर्यंत गेलेल्या नाल्यात कचराच कचरा दिसत आहे. नाल्याच्या मूळ क्षमतेच्या दहा टक्के भागच पाण्याची वाट करून देण्यासाठी जेसीबीच्या मदतीने खुला करण्यात आला आहे. नाला खुला करताना काढण्यात आलेला गाळ रस्त्यावर टाकून देण्यात आला आहे. गत तीन-चार दिवसांपासून हा कचरा परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरवित आहे. तर काही भागांमध्ये डांबरीकरण रस्ता नाल्यातील गटाराने भरला आहे. यामुळे या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. एकूणच संपूर्ण स्थिती हाताबाहेर गेली आहे.स्थानिक शिवाजी गार्डन परिसरात पोलिसांचे बॅरेकेटस् नाल्यात वाहून गेले आहे. वाघापूर मार्ग तर चिखलाने माखला आहे. या भागात वाहन घेऊन जाणे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. दररोज डझनावर नागरिक या रस्त्यावर पडतात.अशीच स्थिती संकटमोचन रोडवरील अंतर्गत रस्त्याची अवस्था अशीच बिकट आहे. टेलिफोनसाठी दोन्ही भागात नाल्या खोदण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण रस्ता निम्म्यावरच आला आहे. रात्रीच्या सुमारास या रस्त्यावरून वाहन चालविणे धोक्याचे आहे.नगराध्यक्षांनी दिले मुख्याधिकाऱ्यांना पत्रशहरातील स्वच्छतेबाबत आणि नाल्यांच्या सफाईबाबत होत असलेल्या दुर्लक्षामुळे नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी संतापल्या आहेत. त्यांनी या प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. शहराच्या स्वच्छतेबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंत्राटदार काम करीत नसेल तर त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे, असे मत त्यांनी नोंदविले आहे. आर्थिक वर्षात लाखो रुपयांचा निधी आरक्षित असताना शहराच्या स्वच्छतेबाबत दुर्लक्ष झाल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.