शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
5
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
6
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
7
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
8
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
9
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
10
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
11
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
12
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
13
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
14
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
15
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
16
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
17
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
18
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
19
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
20
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

यवतमाळ ठरले ‘हॉट स्पॉट’

By admin | Updated: April 17, 2017 00:19 IST

मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील तापमानात वाढ नोंदविली जात आहे. मार्च अखेरपर्यंत तापमान ४२ अंशांच्या घरात पोहोचले.

पारा ४३.५ : एप्रिलमध्ये शहरात शतकातील सर्वाधिक तापमान, दुपारी रस्ते सामसूम रूपेश उत्तरवार  यवतमाळ मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील तापमानात वाढ नोंदविली जात आहे. मार्च अखेरपर्यंत तापमान ४२ अंशांच्या घरात पोहोचले. गुजरात आणि राजस्थानचे वारे जिल्ह्याकडे वळले आहे. यामुळे तापमान ४३.५ अंशांच्या घरात पोहोचले. एप्रिल महिन्यात यवतमाळ शहरातील आजपर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद हवामान खात्याने रविवारी घेतली. ही शतकातली पहिली घटना असल्याचे हवामान अभ्यासकांनी स्पष्ट केले. यवतमाळच्या कृषी विज्ञान केंद्रात तापमान नोंदविण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. तेथील दस्तावेजानुसार जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान मे महिन्याच्या अखेरीस नोंदविले जाते. त्या तापमानाचा पारा ४२, ४३ अंशांपर्यंत असतो. आजवर एप्रिलचे तापमान ४० अंशापर्यंत चढलेले आहे. त्यामध्ये ४३.५ अंशापर्यंतचा पारा एप्रिलमध्यात आतापर्यंत वर चढला नाही. अचानक तापमानात झालेल्या वाढीने हवामान खातेही अवाक् झाले आहे. यवतमाळ शहरात दुपारच्या वेळी रस्ते सामसूम होत आहे. दुपट्टा बांधल्याशिवाय घराच्या दारातही पाय ठेवणे कठीण झाले आहे. कुलरची हवाही गरम फेकत असल्याने दुपारच्या वेळी घामाघूम झाल्याशिवाय पर्याय नसतो. हवामान अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार ही उष्णतेची लाट नाही. तर वाऱ्याच्या दिशेत एकाकी झालेला बदल याला कारणीभूत आहे. उत्तर अरबी समुद्रात उच्च वातावरणात प्रवाहचक्र निर्माण झाले आहे. यामुळे उत्तरेकडून आणि इशान्येकडून येणारे उष्णवारे वाळवंटाकडून मध्य भारताकडे वळले आहे. यासोबत सूक्ष्म उष्णतेची लाटही वाहत आहे. याचा परिणाम तापमान वाढीवर झाला आहे. यामुळे मार्च अखेरपासूनच तापमानात वाढ नोंदविली जात आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, ४३.५ अंशापर्यंत पारा वर चढल्याने अनेक उलथापालथ होण्याची भीती आहे. याचा सर्वाधिक परिणाम भाजी व्यवसायावर झाला आहे. तर फुल व्यवसायाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. फळबागेला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. उन्हाच्या चटक्याने सांभाराचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा सांभार जळाला आहे. याची वाढ खुंटली आहे. तर पालक, मेथी, आंबटचुका, तांदुळकुंद्रा या पालेभाज्याची वाढ खुंटली आहे. टमाटर परिपक्व होण्यापूर्वीच गळून पडत आहे. वांगे, भेंडी, ढेमस बरबटीला याचा फटका बसला आहे. यामुळे भाजीपाला उत्पादकाचे उत्पादन घटले आहे. ही लाट आणखी काही दिवस राहणार असल्याने यवतमाळकरांना उन्हाचे चटके बसणार आहे. फुलबागा करपण्याच्या वाटेवर फुलाच्या पाकळ्या अधिक नाजूक असतात. त्यांना उन्हाची प्रखरता सहन होत नाही. यामुळे उगवलेले फुल करपत आहे. तर कळ्या उगवण्यापूर्वीच गळत आहे. गुलाब, गलार्डीया, लीली आणि मोगऱ्याला याचा फटका बसला आहे. बाजारात येणाऱ्या फुलाची संख्या घटली आहे. यामुळे फुल व्यावसायिकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. आठवडी बाजारात ग्राहकांची घट आठवडी बाजारात ग्राहकांची सर्वाधिक वर्दळ पाहायला मिळते. उन्हाचा चटका वाढल्याने ग्रामीण भागाकडून शहराकडे येणाऱ्या ग्राहकाची संख्या घटली. यामुळे रविवारी बाजारात शुकशुकाट होता. आठवडी बाजारात दुकान लावणाऱ्या विक्रेत्यांना फटका सहन करावा लागला.