शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

यवतमाळ ठरले ‘हॉट स्पॉट’

By admin | Updated: April 17, 2017 00:19 IST

मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील तापमानात वाढ नोंदविली जात आहे. मार्च अखेरपर्यंत तापमान ४२ अंशांच्या घरात पोहोचले.

पारा ४३.५ : एप्रिलमध्ये शहरात शतकातील सर्वाधिक तापमान, दुपारी रस्ते सामसूम रूपेश उत्तरवार  यवतमाळ मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील तापमानात वाढ नोंदविली जात आहे. मार्च अखेरपर्यंत तापमान ४२ अंशांच्या घरात पोहोचले. गुजरात आणि राजस्थानचे वारे जिल्ह्याकडे वळले आहे. यामुळे तापमान ४३.५ अंशांच्या घरात पोहोचले. एप्रिल महिन्यात यवतमाळ शहरातील आजपर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद हवामान खात्याने रविवारी घेतली. ही शतकातली पहिली घटना असल्याचे हवामान अभ्यासकांनी स्पष्ट केले. यवतमाळच्या कृषी विज्ञान केंद्रात तापमान नोंदविण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. तेथील दस्तावेजानुसार जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान मे महिन्याच्या अखेरीस नोंदविले जाते. त्या तापमानाचा पारा ४२, ४३ अंशांपर्यंत असतो. आजवर एप्रिलचे तापमान ४० अंशापर्यंत चढलेले आहे. त्यामध्ये ४३.५ अंशापर्यंतचा पारा एप्रिलमध्यात आतापर्यंत वर चढला नाही. अचानक तापमानात झालेल्या वाढीने हवामान खातेही अवाक् झाले आहे. यवतमाळ शहरात दुपारच्या वेळी रस्ते सामसूम होत आहे. दुपट्टा बांधल्याशिवाय घराच्या दारातही पाय ठेवणे कठीण झाले आहे. कुलरची हवाही गरम फेकत असल्याने दुपारच्या वेळी घामाघूम झाल्याशिवाय पर्याय नसतो. हवामान अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार ही उष्णतेची लाट नाही. तर वाऱ्याच्या दिशेत एकाकी झालेला बदल याला कारणीभूत आहे. उत्तर अरबी समुद्रात उच्च वातावरणात प्रवाहचक्र निर्माण झाले आहे. यामुळे उत्तरेकडून आणि इशान्येकडून येणारे उष्णवारे वाळवंटाकडून मध्य भारताकडे वळले आहे. यासोबत सूक्ष्म उष्णतेची लाटही वाहत आहे. याचा परिणाम तापमान वाढीवर झाला आहे. यामुळे मार्च अखेरपासूनच तापमानात वाढ नोंदविली जात आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, ४३.५ अंशापर्यंत पारा वर चढल्याने अनेक उलथापालथ होण्याची भीती आहे. याचा सर्वाधिक परिणाम भाजी व्यवसायावर झाला आहे. तर फुल व्यवसायाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. फळबागेला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. उन्हाच्या चटक्याने सांभाराचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा सांभार जळाला आहे. याची वाढ खुंटली आहे. तर पालक, मेथी, आंबटचुका, तांदुळकुंद्रा या पालेभाज्याची वाढ खुंटली आहे. टमाटर परिपक्व होण्यापूर्वीच गळून पडत आहे. वांगे, भेंडी, ढेमस बरबटीला याचा फटका बसला आहे. यामुळे भाजीपाला उत्पादकाचे उत्पादन घटले आहे. ही लाट आणखी काही दिवस राहणार असल्याने यवतमाळकरांना उन्हाचे चटके बसणार आहे. फुलबागा करपण्याच्या वाटेवर फुलाच्या पाकळ्या अधिक नाजूक असतात. त्यांना उन्हाची प्रखरता सहन होत नाही. यामुळे उगवलेले फुल करपत आहे. तर कळ्या उगवण्यापूर्वीच गळत आहे. गुलाब, गलार्डीया, लीली आणि मोगऱ्याला याचा फटका बसला आहे. बाजारात येणाऱ्या फुलाची संख्या घटली आहे. यामुळे फुल व्यावसायिकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. आठवडी बाजारात ग्राहकांची घट आठवडी बाजारात ग्राहकांची सर्वाधिक वर्दळ पाहायला मिळते. उन्हाचा चटका वाढल्याने ग्रामीण भागाकडून शहराकडे येणाऱ्या ग्राहकाची संख्या घटली. यामुळे रविवारी बाजारात शुकशुकाट होता. आठवडी बाजारात दुकान लावणाऱ्या विक्रेत्यांना फटका सहन करावा लागला.