शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

पाणीटंचाईने घेतला माळेगावात महिलेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:57 PM

लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : तालुक्यातील ३० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. कंत्राटदाराच्या दावणीला असलेले प्रशासन टंचाई नियोजनात सपशेल अपयशी ...

ठळक मुद्देप्रशासनाचा निष्काळजीपणा : आर्थिक मदतीसाठी ठिय्या आंदोलन, अधिकाऱ्यांवर फौजदारीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील ३० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. कंत्राटदाराच्या दावणीला असलेले प्रशासन टंचाई नियोजनात सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे माळेगाव येथे विहीरीत पडून ४० वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. हा अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी आहे. ग्रामस्थांनी महिलेच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी तसेच दुर्लक्ष करणाºया अधिकाºयावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु केले.विमल साहेबराव राठोड (४०) या महिलेचा सोमवारी ४५ फूट विहिरीत पडून मृत्यु झाला. गावात पाणी नसल्याने महिलांना पायपीट करावी लागते. या घटनेमुळे ग्रामस्थ प्रशासनावर भडकले आहे. त्यांनी महिलेचा मृतदेह माळेगाव येथील बसस्थानकासमोर ठेवला आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे विमल राठोड यांच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी वृत्त लिहीपर्यंत झाली नव्हती.पाणी टंचाईवर मात करण्याचे कारण पुढे करून प्रशासनाने सहा विहीरींचे अधिग्रहण केले. अधिग्रहण केलेल्या विहिरी कोरड्या आहे. आर्थिक हितसंंबंधातून स्थानिक अधिकारी चुकीचे नियोजन करतात. याचाच फटका ग्रामस्थांना बसतो. माळेगाव येथेही हाच प्रकार घडला. ग्रामस्थांनी पंचायत समिती, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना वारंवार पाणी टंचाई उपाययोजनेसाठी निवेदने दिली. त्यानंतरही कागदोपत्री विहीर अधिग्रहण दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.माळेगाव येथे चार विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पुसद उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. अद्यापही अंत्यविधी झाला नाही.- एस.बी. मनवर, प्रभारी गटविकास अधिकारी.माळेगाव येथील विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव अद्यापही तहसील कार्यालयाकडे आलेला नाही. आतापर्यंत तालुक्यात २५ विहीरींचे प्रस्ताव आले आहे. आता नवीन प्रस्तावात माळेगावचा समावेश करण्यात आलेला नाही.- नीलेश मडके, तहसीलदार, महागावपंचायत समितीचे काम ढेपाळले आहे. अधिकारी कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. सभापती प्रभारी गटविकास अधिकारी जनतेच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करतात. यामुळे राजीनामा देण्याच्या मानसिकतेत आहे.- संजय राठोड, उपसभापती, महागाव

टॅग्स :water shortageपाणीटंचाई