शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
5
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
6
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
7
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
8
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
9
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
10
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
11
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
12
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
13
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
14
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
15
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
16
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
17
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
18
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
19
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
20
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’

शेतकऱ्यांना अर्धे सोयाबीन खुल्या बाजारात विकावे लागणार? शासनाच्या अध्यादेशानुसार, केवळ १८ लाख मेट्रिक टनच खरेदी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:22 IST

Yavatmal : संपूर्ण राज्यभरात ४७ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. हे क्षेत्र एकरामध्ये एक कोटी एकरपेक्षा अधिक येते. या क्षेत्रावर सरासरी चार क्विंटल सोयाबीन म्हटले, तर ४ कोटी क्विंटलचे सोयाबीन पीक येण्याचा अंदाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरात एक कोटी एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होते. या क्षेत्रात सरासरी ४० लाख क्विंटलवर सोयाबीनचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. असे असले, तरी राज्य शासनाने हमी दरानुसार १८ लाख ५० हजार ७०० मेट्रिक टनावर सोयाबीनची खरेदी होणार आहे. यामुळे २२ लाख मेट्रिक टन सोयाबीन खुल्या बाजारात विकावे लागणार आहे. खुल्या बाजारात सोयाबीनचे दर क्विंटल मागे एक ते दोन हजार रुपयांनी कमी आहेत. हमी केंद्र असले, तरी खुल्या बाजारात कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.

संपूर्ण राज्यभरात ४७ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. हे क्षेत्र एकरामध्ये एक कोटी एकरपेक्षा अधिक येते. या क्षेत्रावर सरासरी चार क्विंटल सोयाबीन म्हटले, तर ४ कोटी क्विंटलचे सोयाबीन पीक येण्याचा अंदाज आहे. हे सोयाबीन ४० लाख टनापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. निर्धारित उत्पादन आणि खरेदीचे उद्दिष्ट यात तफावत निर्माण होणार आहे. यामुळे अर्धे अधिक सोयाबीन शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकावे लागणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.

९० दिवसांत खरेदी होणार सोयाबीन

राज्य शासनाने सोयाबीन खरेदीसाठी १५ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित केला आहे. यासंदर्भात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने हमी केंद्रावरील सोयाबीन खरेदीसाठी २० दिवसांचे उद्दिष्ट दिले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. या कालावधीत १८ लाख ५० हजार ७०० मेट्रिक टन सोयाबीनचीच खरेदी होणार आहे. असे पत्र काढले आहे. हमी केंद्रावर सोयाबीनला ५,३२८ रुपये क्विंटलचा दर आहे. तर खुल्या बाजारात सोयाबीनला ३२०० ते ४२०० रुपयांचा दर आहे. यामध्ये क्विंटल मागे दोन हजार रुपयांचा फरक आहे.

"राज्य शासनाने मध्य प्रदेशच्या धरतीवर राज्यात भावांतर योजनेनुसार सोयाबीनची खरेदी करावी. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबले. प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ होईल."- विजय जावंधिया, शेती अभ्यासक

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers to Sell Half Soybean in Open Market?

Web Summary : Maharashtra farmers face losses as government buys only 1.8 million tonnes soybean. The rest must be sold in open market, with lower prices, causing financial strain.
टॅग्स :SoybeanसोयाबीनMaharashtraमहाराष्ट्रYavatmalयवतमाळFarmerशेतकरीfarmingशेती