शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना अर्धे सोयाबीन खुल्या बाजारात विकावे लागणार? शासनाच्या अध्यादेशानुसार, केवळ १८ लाख मेट्रिक टनच खरेदी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:22 IST

Yavatmal : संपूर्ण राज्यभरात ४७ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. हे क्षेत्र एकरामध्ये एक कोटी एकरपेक्षा अधिक येते. या क्षेत्रावर सरासरी चार क्विंटल सोयाबीन म्हटले, तर ४ कोटी क्विंटलचे सोयाबीन पीक येण्याचा अंदाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरात एक कोटी एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होते. या क्षेत्रात सरासरी ४० लाख क्विंटलवर सोयाबीनचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. असे असले, तरी राज्य शासनाने हमी दरानुसार १८ लाख ५० हजार ७०० मेट्रिक टनावर सोयाबीनची खरेदी होणार आहे. यामुळे २२ लाख मेट्रिक टन सोयाबीन खुल्या बाजारात विकावे लागणार आहे. खुल्या बाजारात सोयाबीनचे दर क्विंटल मागे एक ते दोन हजार रुपयांनी कमी आहेत. हमी केंद्र असले, तरी खुल्या बाजारात कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.

संपूर्ण राज्यभरात ४७ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. हे क्षेत्र एकरामध्ये एक कोटी एकरपेक्षा अधिक येते. या क्षेत्रावर सरासरी चार क्विंटल सोयाबीन म्हटले, तर ४ कोटी क्विंटलचे सोयाबीन पीक येण्याचा अंदाज आहे. हे सोयाबीन ४० लाख टनापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. निर्धारित उत्पादन आणि खरेदीचे उद्दिष्ट यात तफावत निर्माण होणार आहे. यामुळे अर्धे अधिक सोयाबीन शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकावे लागणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.

९० दिवसांत खरेदी होणार सोयाबीन

राज्य शासनाने सोयाबीन खरेदीसाठी १५ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित केला आहे. यासंदर्भात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने हमी केंद्रावरील सोयाबीन खरेदीसाठी २० दिवसांचे उद्दिष्ट दिले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. या कालावधीत १८ लाख ५० हजार ७०० मेट्रिक टन सोयाबीनचीच खरेदी होणार आहे. असे पत्र काढले आहे. हमी केंद्रावर सोयाबीनला ५,३२८ रुपये क्विंटलचा दर आहे. तर खुल्या बाजारात सोयाबीनला ३२०० ते ४२०० रुपयांचा दर आहे. यामध्ये क्विंटल मागे दोन हजार रुपयांचा फरक आहे.

"राज्य शासनाने मध्य प्रदेशच्या धरतीवर राज्यात भावांतर योजनेनुसार सोयाबीनची खरेदी करावी. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबले. प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ होईल."- विजय जावंधिया, शेती अभ्यासक

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers to Sell Half Soybean in Open Market?

Web Summary : Maharashtra farmers face losses as government buys only 1.8 million tonnes soybean. The rest must be sold in open market, with lower prices, causing financial strain.
टॅग्स :SoybeanसोयाबीनMaharashtraमहाराष्ट्रYavatmalयवतमाळFarmerशेतकरीfarmingशेती